एस वाय कुरेशी यांचे जीवनचरित्र “मी स्वतःला संपवणार” माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मुख्य निवडणूक आयुक्तांना का म्हणाले?

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा एक किस्सा माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय कुरेशी यांनी आपल्या ‘इंडिया अँड आय : अ हंड्रेड मेमरीज नॉट अ मेमोइर’ या पुस्तकात सांगितला आहे. कुरेशी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याशी झालेल्या एका भावनात्मक आठवणीचा संदर्भ दिला आहे.

जेव्हा निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काही मंत्र्यांच्या अतार्किक वक्तव्यांमुळे व्यथित झालेल्या कुरेशी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे आपली नाराजी व्यक्त केली होती तेव्हाचा हा किस्सा आहे. जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी नाराज झाले तेव्ह  पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कुरेशी यांना असेही सांगितले होते की, निवडणूक आयोग केवळ “भारताचा अभिमान” नाही, तर देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि जर आपण तो गमावला, तर आपण सर्व काही गमावू. एस. वाय. कुरेशी यांनी त्यांच्या आगामी ‘इंडिया अँड आय: अ हंड्रेड मेमरीज, नॉट अ मेमोइर’ या पुस्तकात या रंजक संभाषणाचा उल्लेख केला आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली

आपल्या पुस्तकात, माजी मुख्य निवडणूक आयुक्त मनमोहन सिंग यांना एक असे नेते म्हणून आठवतात , ज्यांच्यासाठी घटनात्मक शिष्टाचार केवळ भाषणांपुरता मर्यादित नव्हता, तर तो त्यांच्या आचरणाचा आणि विचारांचा अविभाज्य भाग होता. कुरेशी यांच्या मते, जानेवारी २०१२ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका होत होत्या. त्यावेळी, कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी एका निवडणूक सभेत आश्वासन दिले होते की, जर त्यांचा पक्ष सत्तेवर आला, तर नोकऱ्यांमधील मुस्लिमांचे आरक्षण ४.५ टक्क्यांवरून ९ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​जाईल.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय कुरेशी

माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे.

हॅशेट इंडियाने प्रकाशित केलेल्या आणि लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या एका पुस्तकात एस. एस. कुरेशी लिहितात, “भारतीय जनता पक्षाने तात्काळ निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि याला आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन म्हटले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणतीही नवीन योजना जाहीर केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.”

ते लिहितात, “आम्ही चार दिवसांची सुनावणी घेतली. अभिषेक मनु सिंघवी यांनी काँग्रेसतर्फे आणि अरुण जेटली यांनी भाजपतर्फे युक्तिवाद केला. निवडणुकीचे आश्वासन आणि मतदारांना दिलेले प्रलोभन यांच्यातील सीमारेषा कोठे आखायची, या गुंतागुंतीच्या प्रश्नावर दोन नामवंत कायदेतज्ज्ञ आपल्या युक्तिवादाची धार आजमावत होते. अखेरीस, निवडणूक आयोगाने खुर्शीद यांची निर्भर्त्सना केली.”

माजी पंतप्रधान दिवंगत मनमोहन सिंह

एस. वाय. कुरेशी हे जुलै २०१० ते जून २०१२ पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

कुरेशींच्या मते, आदर्श आचारसंहितेनुसार आयोगाकडे उपलब्ध असलेली ही सर्वात कठोर कारवाई होती. जुलै २०१० ते जून २०१२ या काळात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेल्या कुरेशींच्या मते, आयोगाच्या या कारवाईमुळे खुर्शीद स्पष्टपणे नाराज होते.

यानंतर, निवडणूक आयोग अहंकारी किंवा मनमानी बनला आहे, अशी चिंता काँग्रेसमधील काही जणांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली. कुरेशी पुस्तकात लिहितात, “टीका मला कधीच त्रास देत नाही, पण संस्थांची विश्वासार्हता हळूहळू कमी करणारी छुपी विधाने त्रास देतात. अशी हास्यास्पद विधाने अस्वीकार्य होती.”

हे सगळं प्रकरण पंतप्रधानांना समजलं

दरम्यान, एस. वाय. कुरेशी यांनी ईदच्या निमित्ताने त्यांच्या घरी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. पाहुण्यांमध्ये तत्कालीन पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी हरीश खरे यांचा समावेश होता. संभाषणादरम्यान, कुरेशींनी त्यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली. हरीश खरे यांनी विचारले, “मी पंतप्रधानांना सांगू का?” कुरेशी म्हणाले, “हो, मी तुम्हाला तेच सांगायला सांगत आहे.”

दुसऱ्या दिवशी, कुरेशींचा RAX (Restricted Access Exchange) फोन वाजला. फोन करणाऱ्याने सांगितले, “पंतप्रधानांना तुमच्याशी तातडीने बोलायचे आहे.” काही क्षणांतच, मनमोहन सिंग फोनवर होते. त्यांच्या आवाजात चिंता होती. ते म्हणाले, “कुरेशीजी, मी तुम्हाला लगेच भेटू शकतो का?”

पंतप्रधानांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली

कुरेशींच्या म्हणण्यानुसार, मनमोहन सिंग यांच्या आवाजाच्या सुरावरून असे वाटत होते की, ते स्वतःच त्यांना भेटायला येऊ इच्छित आहेत. ते म्हणाले, “साहेब, तुम्ही पंतप्रधान आहात. तुम्ही सांगाल तेव्हा मी येईन.” ही भेट संध्याकाळी ७ वाजता ठरली होती. त्या संध्याकाळी कुरेशी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले.

कुरेशी म्हणाले, “मनमोहन सिंग दारात वाट पाहत होते. ते मला आत घेऊन गेले आणि आम्ही नीट बसायच्या आतच सिंग अत्यंत व्यथित आवाजात म्हणाले, ‘तू काय म्हणालास ते हरीशने मला सांगितले. जर तू असा विचार करत असशील, तर मी आत्महत्या करेन.’”

कुरेशींना हे ऐकून धक्का बसला.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त लिहितात की, हे ऐकून त्यांना धक्का बसला. त्यांची तक्रार मनमोहन सिंग यांच्याबद्दल नसून काही मंत्र्यांच्या वर्तनाबद्दल होती. कुरेशींच्या मते, मनमोहन सिंग नेहमीच निवडणूक आयोगाला भारताचा अभिमान आणि देशाची सॉफ्ट पॉवर म्हणत असत.

कुरेशी त्यांच्या हेतूंवर शंका घेऊ शकतात, ही कल्पना करणेही त्यांच्यासाठी असह्य होते. मनमोहन सिंग त्यांना म्हणाले, “मला काहीच कल्पना नव्हती. जर मला माहीत असते, तर मी त्याला कठोरपणे फटकारले असते. जर तुम्हाला कधी काही बोलायचे असेल, तर फक्त फोन उचला आणि माझ्याशी बोला.”

Comments are closed.