अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये फायनल सामना; भारत आणि पाकिस्तानमधील थरार कधी रंगणार?
मुंबई : टी-20 क्रिकेट विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून पुढील वर्षी 7 फेब्रुवारीपासून हा थरार रंगणार आहे. सर्वांचं लक्ष लागलेले भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 15 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. तसेच या विश्वचषकातील उपांत्य सामने हे कोलंबो आणि मुंबईमध्ये होणार आहेत. तर अंतिम सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद) होणार आहे. रोहित शर्मा हा टी-20 विश्वचषकाचा ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे.
यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद हे भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे बजावणार असून एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. त्याचे चार गटात विभाजन करण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून 15 फेब्रुवारी रोजी या दोन देशात सामना होणार आहे.
दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच भारतात आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईसह, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता आणि अहमदाबाद येथे होणार विश्वचषकाचे सामने तसेच श्रीलंकेतील चार ठिकाणी सामने होणार आहेत.
T20 विश्वचषक 2026 पूर्ण वेळापत्रक : विश्वचषकाचे गट कोणते?
A मिळाले: भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलँड, नामिबिया
गट ब: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
गट क: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
गट ड: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई
ICC पुरुषांचे वेळापत्रक @T20WorldCup 2026 येथे आहे! 📅
ICC चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील एका उत्सव कार्यक्रमात सामने आणि गटांचे अनावरण करण्यात आले @जयशाहआणि नवीन टूर्नामेंट ॲम्बेसेडरसह @ImRo45 आणि भारतीय संघाचे कर्णधार @surya_14kumar आणि हरमनप्रीत कौर उपस्थित होते.
✍️:… pic.twitter.com/fsjESpJPlE
— ICC (@ICC) 25 नोव्हेंबर 2025
T20 विश्वचषक 2026 भारताचे सामने: भारताचे सामने कधी?
15 फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तान
7 फेब्रुवारी भारत विरुद्ध अमेरिका (मुंबई वानखेडे)
१२ फेब्रुवारी भारत विरुद्ध नामिबिया (नवी दिल्ली)
18 फेब्रुवारी भारत विरुद्ध नेदरलँड्स (अहमदाबाद)
आणखी वाचा
Comments are closed.