भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?

मुंबई : भारतानं इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. संजू सॅमसनची दमदार फलंदाजी, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी आणि अक्षर पटेलच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळं भारतानं अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. इंग्लंडच्या बेथेलनं 105 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. भारताच्या विजयावर मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरनं प्रतिक्रिया दिली आहे.भारतानं प्रथम फलंदाजी करताना 253 धावा केल्या होत्या. इंग्लंडनं या धावसंख्येचा पाठलाग करताना 7 विकेटवर 246 धावा केल्या.

मोहम्मद कैफ काय म्हणाला?

आजचा सामना दमदार झाला, मी असे सामने कमी पाहिले आहेत. आजच्या मॅचमध्ये 500 धावा झाल्या. सर्वांनी चौकार षटकार मारले. शेवटच्या ओव्हरमध्ये कोण जिंकणार हे समजलं. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करतेय हा चांगला निर्णय होता. भारत 7 धावांनी जिंकला आहे. जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या एक विकेट घेतली. यामुळं भारतानं विजय मिळवला, असं कैफ म्हणाला.

संजू सॅमसनजी कामगिरी केली तिथून 200 धावा बनतात. तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी केलेल्या कामगिरीमुळं भारत 253 धावांपर्यंत मजल मारली. भारतानं सामना जिंकला हे पूर्ण संघाचं श्रेय आहे, असंही कैफ म्हणाला.रोहित शर्माकडे सहा गोलंदाज होते, यावेळी सूर्यकुमार यादवकडे 5 गोलंदाज आहेत. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचे निर्णय देखील महत्त्वाचे ठरले, असंही मोहम्मद कैफनं म्हटलं.

शोएब अख्तर काय म्हणाला?

अक्षर पटेल चांगला क्षेत्ररक्षक असून त्यानं गोलंदाजी केली आहे. भारत फलंदाजीला येतो तेव्हा जगातील सर्वात बेस्ट टीम आहे. भारतानं क्षेत्ररक्षणात कमी चुका केल्या. इंग्लंडनं जास्त चुका क्षेत्ररक्षणात केल्या ते घाबरले होते. जर सॅम करननं 15 बॉल खेळले नसते तर मॅच फसली असती. बुमराह जेव्हा धावा वाचवण्यासाठी येतो तेव्हा ते अफलातून कामगिरी करतात. बुमराहनं यॉर्करचा मारा केला आणि धावा वाचवल्या, असं शोएब अख्तरनं म्हटलं.

भारताच्या संघ व्यवस्थापनाला संजू सॅमसनला संधी देण्यासंदर्भात क्रेडिट द्यावं लागेल. संघ व्यवस्थापनानं दोन जणांना बाहेर बसवलं आहे. संजू सॅमसन 10 वर्ष भारतासाठी खेळला असता तर त्याच्या नावावर प्रत्येक फॉरमॅटमध्ये 10 -10 हजार धावा लागल्या असत्या. संजू सॅमसन हा रोहित शर्माची बेटर कॉपी वाटतो. संजू मॅच फिनिशर आहे. संजू सॅमसनं फलंदाजीला येताच जोफ्रा आर्चरची धुलाई केली. संजू सॅमसननं त्याच्या फलंदाजीनं भारताच्या डावाचा पाया रचला, असं शोएब अख्तरनं म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उपांत्य फेरीत झाला असता आनंद झाला असता, असं शोएब अख्तर म्हणाला. भारत जिंकलाय याचा आनंद होतोय, असं शोएब अख्तर म्हणाला.  जर, भारत आणि पाकिस्तान सामना झाला असता तर पाकिस्तान जिंकला असता, असंही शोएब अख्तरनं म्हटलं. भारतानं अहमदाबादमध्ये जाऊन न्यूझीलंडचा पराभव करावा, असंही शोएब अख्तरनं म्हटलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.