झिम्बाब्वेला नमवत भारताने इंग्लंडचा हिशेब केला पूर्ण; 14 दिवसांतच हिसकावलं नंबर-1 स्थान
झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने TEAM INDIA दुसरा सामना 90 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह, टीम इंडियाने आयसीसी (ICC) टी-20 संघ क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान मालिकेतील शेवटचा टी-20 सामना गमावल्यामुळे भारताने 13 दिवसांपूर्वीच हे अव्वल स्थान गमावले होते. मात्र, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ टी-20 मालिकाच जिंकली नाही, तर अव्वल मानांकनही पुन्हा मिळवले आहे.
आयसीसीच्या ताज्या टी-20 संघ क्रमवारीनुसार, भारत 268 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचेही 268 रेटिंग गुण असले तरी, दशांश गुणांमधील फरकामुळे भारत अव्वल स्थानावर आहे. परिणामी, झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा आणि अंतिम टी-20 सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हा सामना जिंकल्यास त्यांना रेटिंग गुण आणखी वाढवण्याची संधी मिळेल.
दरम्यान, टी-20 क्रमवारीतील इतर संघांच्या स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर कायम आहेत, तर पाकिस्तान 240 रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या विजयात यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या 44 चेंडूंमध्ये 81 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त, उपकर्णधार तिलक वर्मा ज्यावर अलीकडील खराब फॉर्ममुळे टीका होत होती. त्याने 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत जोरदार पुनरागमन केले.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी-20 सामना आज 26 जुलै रोजी हरारे येथे खेळला जाईल. हा सामना जिंकून मालिकेत 3-0 असा ‘क्लीन स्वीप’ साधण्याच्या उद्देशाने भारत मैदानात उतरेल.
Comments are closed.