‘चुकीला माफी नाही, मयताला न्याय देणार’, आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना
वानराज अंदेकर खून प्रकरण: ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरामध्ये टोळीयुद्धाचा मोठा भडका उडाल्याचं दिसून आलं. वर्षभरापूर्वीच 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आता वनराजच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या हत्येचा बदला घेण्यात आला आहे. आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा 18 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याला आंदेकर टोळीने टार्गेट केलं आणि त्याचा बळी घेतला. या हत्येनंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये मामा भाचा सगळी नाती असली तरी देखील गुन्हा हा गुन्हा आहे, गुन्हेगारांनी शिक्षा दिली जाईल आणि गुन्हा करणाऱ्यांना पोलिसांनी इशारा देत म्हटलं की, चुकीला माफी नाही. प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.
कोणताही गुन्हा करताना शंभर वेळा विचार करा
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी एपीबी माझाशी बोलताना पुण्यातील गुन्हेगारांना इशारा दिला आहे. या प्रकरणात कुणीही जबाबदार असला तरी त्याला सोडणार नाही. मयताला न्याय देणं आमचं काम आहे, असं पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितलं आहे. आता चुकीला माफी नाही, कोणताही गुन्हा करताना शंभर वेळा विचार करा, असा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी याप्रकरणात सखोल तपास सुरू आहे, गुन्हा रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
एकदम आततायीपणे निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य नाही
पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या गोळीबाराची माहिती देताना म्हटलं की, “या सगळ्या प्रकरणाचा दोन तासांत उलगडा झाला आहे. मयताचं नाव आयुष गणेश कोमकर आहे. तो क्लासवरून घरी आल्यानंतर बेसमेटमध्ये त्याच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडल्या. आयुषचे वडील गणेश कोमकर हा मागील वर्षी झालेल्या वनराज आंदेकरच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. पोलीस प्रत्येक बाबींचा विचार करून चौकशी करत आहे. एकदम आततायीपणे निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य नाही. या घटनेला जो जबाबदार असेल, त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. प्राथमिकदृष्ट्या या प्रकरणात दोघांचा समावेश असल्याचं दिसून आलं आहे. मात्र यात आणखी लोक गुंतलेले असू शकतात, असा आम्हाला संशय आहे.”
हा गुन्हा कुठल्याही चौकटीत कुणालाही माफ करण्यासारखा नाही
“मयत व्यक्तीला न्याय देणं आमचं काम आहे, आणि आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ. पोलीस आतापर्यंत चोखपणे आपलं काम पार पाडत आले आहेत. येथून पुढेही पार पाडू. गुन्हे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. हा जो गुन्हा आहे, हा गुन्हा कुठल्याही चौकटीत कुणालाही माफ करण्यासारखा नाही. लोकांनी आम्हाला साथ द्यायची आहे. कोणीही, कुठल्याही अफवा पसरवायच्या नाहीत. चुकीची माहिती पसरवायची नाही. आम्ही आमचं काम निश्चितपणे पार पाडणार, येथून मागेही आम्ही आमचं काम पार पाडलं आहे. आता चुकीला माफी नाही. प्रत्येक गोष्ट करताना गुन्हेगारांनी १०० वेळा विचार करावा, आणि आम्हाला साथ द्यावी”, असंही पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=2nf6xdz-iky
आणखी वाचा
Comments are closed.