काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष झालाय, पक्ष नेतृत्वहीन आहे; अशोक चव्हाणांची टीका, सांगितलं राज’कार

नांदेड : राज्याचं राजकारण अनिश्चितेचं बनलं असून कधी कोण कुठल्या राजकीय पक्षात आणि कुणासोबत युती करेल हे सांगता येत नाही. नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आजच भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप (भाजप) नेतृत्वावर गंभीर आरोप करणारे, टीका करणारे बडगुजर यांचा भाजप प्रवेश अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. दुसरीकडे सांगलीतील काँग्रेस नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या नातसुनेनं काँग्रेसचा (Congress) हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन, अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्याच संदर्भाने माजी काँग्रेस नेते व विद्यमान भाजप खासदार अशोक चवन (अशोक चवन) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केलीय, काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचं चव्हाण यांनी म्हटलं.

दिवंगत वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसुनेने सांगलीत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून लवकरच त्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्याच अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत, काँग्रेसची अवस्था ही नात्यागोत्याचा पक्ष असल्यासारखी झालीय, असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं. काँग्रेसकडे प्रेरणा देण्यासारखं काम नाही, रोड मॅप तयार करावा लागतो.  अशी टीका चव्हाण यांनी काँग्रेसवर केली. तसेच, काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे, हेच यामागचं प्रमुख कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँगेसच्या काळात विकास झाला,  मात्र त्यापेक्षा दुपटीने मागच्या अकरा वर्षात देशाचा विकास झाला. मी काँगेस मध्येच होतो. काँगेसच्या काळात विकास झाला नाही का या प्रश्नाचा रोख माझ्याकडेच आहे हे मला कळल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी मारला. काँगेसच्या काळात ही विकास झाला मात्र जो विकास मागच्या अकरा वर्षात झाला तो अधिक गतीने झाला, असं अशोक चव्हाण म्हणाले. आज जमाना आयपीएलचा आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणं महत्त्वाचं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047 पर्यंत करण्याचं धोरण ठेवल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई

जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यानंतर वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा प्रवेश होणार आहे.

हेही वाचा

शेतीसाठी AI धोरण मंजूर, आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचं मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.