प्रेमसंबंध पण लग्नाला नकार, दुसरीकडे जुळलेलं त्याचं लग्नही तिने मोडलं; दिराने वहिनीला संपवलं, प

भंडारा : प्रेमसंबंध असलेल्या वहिनीनं लग्नाला नकार दिल्यानं दीरानं वहिनीची हत्या (Bhandara Crime News) केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. त्यानंतर दुचाकीनं (Bhandara Crime News) पळून गेलेल्या आरोपी दीराला लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीतून अटक केली. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील भागडी इथं घडली. आरोपी गौरव अंबादे आणि मृत महिला माधुरी अंबादे हे दोघेही ब्रह्मपुरीचे आहेत.(Bhandara Crime News)

Bhandara Crime News: …म्हणून केली वहिनीची निर्घृणपणे हत्या

तर मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं असून तिला आठ वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, या महिलेचं नात्याने दीर असलेल्या गौरव अंबादे याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. गौरवनं वहिनी माधुरीला लग्न करण्याची मागणी केली. वहिनीनं लग्नास नकार दिला. त्यामुळं गौरवनं दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचं ठरवलं होतं. मात्र, जोडलेला विवाह वहिनीनं तोडला (Bhandara Crime News) आणि स्वतःही विवाह करीत नाही, हा राग मनात पकडून गौरवनं वहिनीचा भंडाऱ्याच्या भागडी गावात धारदार चाकूनं वार करून गंभीर केली आणि त्यानंतर उशीनं तोंड दाबून हत्या (Bhandara Crime News) केल्याची कबुली आरोपी गौरवनं पोलिस तपासात कबुली दिली. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपी गौरवला लाखांदूर पोलिसांनी ब्रम्हपुरीतून अटक केली.(Bhandara Crime News)

ही घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे रविवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास घडली. ब्रह्मपुरी येथील ३० वर्षीय महिलेची तिच्याच दिराने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केली आहे. ही थरकाप उडवणारी घटना महिलेच्या लहान मुलीसमोर घडल्याची माहिती समोर आली आहे. माधुरी तुळसीदास अंबादे (३०, रा. ब्रह्मपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर दुचाकीवरून फरार झालेल्या आरोपी गौरव अंबादे याला पोलिसांनी पकडले आहे.

माधुरी तुळसीदास अंबादे या आपली मुलगी जानवी (८, रा. ब्रह्मपुरी) आणि आरोपी गौरव अंबादे (२५, रा. ब्रह्मपुरी) याच्यासह पालांदूर येथे एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. रविवारी (दि. २६) परत येताना उशीर झाल्यामुळे त्यांनी भागडी येथील नातेवाईक नाजुका गणवीर यांच्या घरी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्याच घरी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Bhandara Crime News: नेमकं काय घडलं?

पाच वर्षांपूर्वी माधुरी अंबादे यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर त्या मुलीसह वास्तव्यास होत्या. दरम्यान, त्यांचे आरोपी दिरासोबत कथित प्रेमसंबंध जुळल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने लग्नासाठी तगादा लावला होता; मात्र माधुरी यांनी त्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. याच कारणावरून आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा माधुरी यांनी त्याचा एक विवाहसंबंध मोडल्याचीही चर्चा आहे.या वैयक्तिक वादातूनच हत्येची घटना घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस या दृष्टीनेही तपास करत असल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.