विराट कोहली IPL फायनलनंतर निवृत्त होणार? RCB च्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांचे धाबे दणाणले; जाणून

विराट कोहली आयपीएल फायनलनंतर निवृत्त आयपीएल 2026 चा महामुकाबला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. या मोठ्या मंचावर नेहमीच अप्रतिम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मात्र, रविवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या या अंतिम सामन्यानंतर 37 वर्षीय विराट कोहली आयपीएलला अलविदा करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

आरसीबीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते हैराण (Virat Kohli Retiring From IPL After Final)

बंगळुरू फ्रँचायझीच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून विराट कोहलीचा एक फोटो शेअर करण्यात आला, ज्याला ‘The Last Mile’ (शेवटचा टप्पा) असे कॅप्शन देण्यात आले होते. ही पोस्ट पाहताच चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. फायनलनंतर किंग कोहली आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याचे हे संकेत तर नाहीत ना, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली.

काय आहे सत्य? (Virat Kohli Retiring Fact Check)

या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही. टायटन्सविरुद्धच्या या जेतेपदाच्या लढतीनंतर विराट कोहली आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याचे कोणतेही संकेत स्वतः विराटने किंवा संघ व्यवस्थापनाने दिलेले नाहीत. ‘द लास्ट माईल’ या कॅप्शनचा अर्थ या हंगामातील विजेतेपदाच्या प्रवासाचा अंतिम टप्पा असा आहे, कोहलीच्या कारकिर्दीचा नाही. विराटचा खेळाप्रती असलेला त्याची भूक पाहता, तो अजून किमान दोन वर्षे या कॅश-रिच लीगमध्ये खेळू शकतो. आरसीबीला अजून यशाच्या शिखरावर नेण्याची त्याची इच्छा कायम आहे.

विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासात 9,000 हून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज असून, 2008 पासून या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा तो खेळाडू आहे. आयपीएल 2026 मध्येही त्याचे बॅट चमकली असून, त्याने रायपूरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) ठोकलेल्या शतकासह या हंगामात 600 हून अधिक धावा केल्या आहेत.

आरसीबी विरुद्ध गुजरात : कोण उंचावणार दुसरी ट्रॉफी?

रविवारच्या फायनलमध्ये जो संघ जिंकेल, तो आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या वर्षी याच मैदानावर पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करून आपले पहिले विजेतेपद पटकावले होते आणि जेतेपदाचे दुष्काळ संपवले होते. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारकडे आता रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्या क्लबमध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी आहे, ज्यांनी आपले विजेतेपद यशस्वीरित्या राखले आहे. तसेच, कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या दोन हंगामात सलग दोन ट्रॉफी जिंकणारा तो पहिलाच कर्णधार ठरू शकतो.

दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलकडे हार्दिक पांड्यानंतर गुजरातला विजेतेपद मिळवून देणारा दुसरा कर्णधार बनण्याची संधी आहे. गिलने या हंगामात फलंदाजीत कमालीचे प्रदर्शन केले असून, एका शतकासह 722 धावा केल्या आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत अटीतटीची आणि थरारक होणार यात शंका नाही.

हे ही वाचा –

India A Squad Update : टीम इंडियात मोठे फेरबदल, रियान परागला BCCIकडून बाहेरचा रस्ता, ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधार म्हणून संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण Squad

आणखी वाचा

Comments are closed.