चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलिया विजयी
लॉर्ड्स: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाचे महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. रविवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या करो या मरोच्या महामुकाबल्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवासोबतच भारतीय संघाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास इथेच संपला असून संघ अधिकृतपणे सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारतीय संघ यंदा इतिहास रचेल अशी भारतीय चाहत्यांना मोठी अपेक्षा होती, परंतु ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा मोठ्या सामन्यांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत भारताला स्पर्धेतून पॅक-अप करण्यास भाग पाडले.
बातमी अपडेट होत आहे..
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.