मुंबईत उद्धव ठाकरेंचे प्राबल्य, मनपा निवडणुकीबाबत चर्चा करू, शरद पवारांचे मोठं भाष्य
पुणे: राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकाकडे लागलं आहे. अशातच जागावाटप, चर्चा, गाठीभेटी, पक्षप्रवेश, दावे यामुळे देखील राजकारण चांगलच तापलं आहे, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणुका लढण्याबाबत मोठं भाष्य केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. आम्ही अजून चर्चा केली नाही. आम्ही काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Uddhav Thackeray Shivsena) आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून त्याबाबतची चर्चा करू. पण निवडणूक एकत्र लढण्याची इच्छा आहे, असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्याच्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं का नाही ते बसून ठरवू. मुंबईत आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्याचबरोबर साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. आम्ही अद्याप लढण्याबाबत चर्चा केलेली नाही. आम्ही सर्वजण मिळून चर्चा करू. त्यामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, आम्ही स्वतः आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसू असंही पुढे शरद पवार म्हणालेत.
हिंदीची सक्ती असू नये, पण…
राज्यातील पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यावरून विरोध दर्शवला जात आहे, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. त्यामुळे पालकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यावा, अशी व्यवस्था असावी,” अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे. तसंच “एक गोष्ट दुर्लक्षित करू नये की, या देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी भाषा बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी हिंदीकडे दुर्लक्ष करू नये. पण असं असलं तरीही हिंदीची सक्ती मात्र योग्य नाही,” असंही पवार म्हणाले.
PDCC बँकेवर बोलताना म्हणाले…
लोकसभा निवडणुक झाली त्यावेळी बँक उघडलेली होती. आज या बॅंकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे. बॅंक कशी उघडी होती. बॅंकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बॅंक कशाला उघडेल. एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=JQSX2SSN0CS
आणखी वाचा
Comments are closed.