शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच मांडला होता; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
मुंबई : राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडून आता 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या 3 वर्षात दोन्ही शिवसेना(Shivsena) पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत असून निवडणुकांनाही ते सामोर गेले आहेत. आधी लोकसभा, नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. आता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही तसाच सामना रंगणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू खासदार संजय राऊत दररोज माध्यमांतून मांडतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत (Sanjay Raut) हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळी संजय राऊत यांनाही सोबत गुवाहटीला यायचे होते. मात्र, सोबतच्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला. त्यामुळे राऊत यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची मोठी पोटदुखी आहे, असा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी केला होता. जर असल्या पूजा करून कोण निवडून येत असतं तर आम्हाला काय कवट्या मिळत नाहीत का? सुया मिळत नाहीत का? हे सगळं थोतांड आहे, असे सांगत मंत्री भरत गोगावलेंची पाठराखण ही त्यांनी केली होती. दरम्यान, संजय राऊतांकडून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर दररोज शाब्दिक हल्ले चढवले जातात. पक्षफुटीवरुन जोरदार टीका केली जाते. मात्र, आता शहाजी बापू पाटील यांच्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संजय राऊतांबद्दल खळबळजनक दावा केला आहे.
शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच दिला
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुवाहटीतील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावरुन आता गुलाबराव पाटील यांनीही खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शिवसेना फुटली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते, मात्र 35 ते 36 आमदारांनी त्यांना विरोध केला, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले. आता, मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील शहाजी बापूंची री ओढली आहे. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. मात्र, ते त्यावेळेस थांबले, संजय राऊतच सर्वात पहिले फुटणार होते, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2025 | रविवार
आणखी वाचा
Comments are closed.