गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर गलिच्छ टीका, शरद पवारांनी फडणवीसांना फोन लावून सुनावलं!

गोपीचंद पडलकरवरील शरद पवार: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी अशी गलीच्छ टीका करणं योग्य नाही, असं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं. तसेच गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आहे, असंही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन सांगितले.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?

गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना, जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, अशी पातळी सोडून टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. जयंत पाटलांनी मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला.  याने महाराष्ट्र कसा चालवला, जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही. जयंत पाटलाचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करण्याचं आहे. पण मी काय आता आलोय का? असे अनेक अंगावर घेऊन आलोय. या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय. जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिलं. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, असं विधान गोपीचंड पडळकर यांनी केलं होतं.

गोपीचंद पडळकरांच्या विधानावर अजित पवार काय म्हणाले?

वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे, महायुती पक्षामधील तीन पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केलं आहे, त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं आमचं धोरण आहे. शिवसेनेसंदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील, आमच्या पक्षाकडून जर काही विधान झालं त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, असं अजित पवार म्हणाले. तसेच गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे , पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळा यापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे . त्यामुळे म्हणून प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊ नये . असे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे ह असतात त्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट करू नये आणि संविधानाने आणि घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला अधिकार दिला आहे त्याचा वापर करत असताना समाजामध्ये सलोखा राहील आणि वातावरण चांगले राहील या प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे, असं अजित पवारांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=OALXXEAUPA8

आणखी वाचा

Comments are closed.