महापालिकेन अनधिकृत घोषित केलेल्या हॉटेलविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली; राजू पाटलांना दणका


ठाणे : कल्याणमधील शीळ रस्त्यावर पलावा पुलाच्या बाजूला असलेले महालक्ष्मी हॉटेल केडीएमसीने अनधिकृत असल्याचे घोषित केले होते. या संदर्भात मनसे नेते राजू पाटील (Raju Patil) यांनी दाखल केलेली जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका का फेटाळली गेली आहे? अजून याचा तपशील येणे बाकी आहे. तपशील आल्यानंतर आम्ही योग्य ती पुढची कारवाई करू, असे मनसेचे (MNS) अधिकृत हर्षद पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पलावा पूलाचे काम प्रस्तावित करण्यात आले. एमएसआरडीसीकडून हे काम मंजूर केले गेले. या पूलाच्या कामासाठी कंत्राटदार नेमला गेला. हा पूल दोन मार्गिकेचा आहे. या पूलाच्या कामाच्या दर्जाबाबत आणि दिरंगाई बाबत मनसे नेते राजू पाटील यांनी अनेकदा प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष्य केले होते. या पूलाचे काम मार्गी लागत नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. अखेरीस शीळहून कल्याणच्या दिशेने जाणारी पूलाची एक मार्गिका खुली करण्यात आली. तिचे उद्घाटन करण्यात आले. त्यावरुनही सत्ताधारी पक्षाने टिका करत लक्ष केले.

प्रशासनाने घाई गडबडीत पुलाची ही मार्गिका खुली केल्याने आजही हा पूल चर्चेचा विषय ठरला आहे. ही एक मार्गिका उघडा करुन वाहतूक कोंडी दूर होणार नाही. त्यासाठी कल्याणहून शीळच्या दिशेने जाणाऱ्या पुलाच्या मार्गिकेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याकडे, मनसेने नेते राजू पाटील यांनी लक्ष वेधले. या दुसऱ्या मार्गिकेच्या कामात आड येणारे महालक्ष्मी कृपा हॉटेलवर कारवाई केली जात नाही. त्यासाठी युती बदलण्यात आल्याचा आरोपही मनसे नेते पाटील यांनी केला होता. या हॉटेलला महापालिकेने बेकायदा ठरविले होते. तरी देखील त्या विरोधात कारवाई केली जात नाही. अखेर राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन कारवाईची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

यासंदर्भात हॉटेल मालक दीपा पाटील यांनी सांगितले च्या, मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी याचिका दाखल केलेली होती. जे महालक्ष्मी हॉटेल आहे. त्यामुळे विकास कामाला अडथळा येतात. या वास्तूला 35 वर्षे झाले आहे. त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली. आम्ही विकास कामाला अडथळा आणला नाही. हे लोक सांगतात हॉटेल अनधिकृत आहेत, आम्हाला त्रास देतात. 2022 लाही केस केली होती ती केस फेटाळली आहे, आजही ती केस फेटाळली. Lalchand पाटील यांनी सांगितले की, राजू पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेच्या विरोधात निकाल आला आहे. निकाल आमच्या बाजूने लागला आहे. कल्याण शीळ रस्त्याला आम्ही 19 गुंठे जागा दिलेली आहे. तरी पण हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायदेशीर हॉटेल असल्याचे याचिकेत म्हटले होते. हायकोर्टाचा निकाल आमचा बाजूने लागला आहे.

हायकोर्टाची ऑर्डर मिळाल्यावर पुढील कारवाई करू

मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी सांगितले की, 2020 साली केडीएमसीने बेकायदा बांधकाम आणि लक्ष्मी हॉटेल अनधिकृत आहे. त्यापूर्वी देखील मनसे माजी आमदार राजू पाटील हे केडीएमसी सोबत पत्र व्यवहार करीत होते. त्या विरोधात कारवाई करावी. ज्यांची जागा या रस्त्यात गेलेली आहे. त्यांना योग्य तो मोबदला देऊन कारवाई करण्यात यावी. केडीएमसीकडून कारवाई करण्यात येत नव्हती. त्यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. केडीएमसीने कारवाई करावी असे आदेश न्यायालयाने केडीएमसीला द्यावेत अशी, आमची मागणी होती. हायकोर्टाने याचिका फेटाळली याची ऑर्डर आम्हाला मिळालेली नाही, ऑर्डर मिळताच योग्य ती पुढील कारवाई करुअसे पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा

गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत; बार्शीत शेतकऱ्यांनी अडवला मंत्र्यांचा ताफा, गाडीलाच आडवे

आणखी वाचा

Comments are closed.