गोळी छातीतून शिरली अन् पाठीतून बाहेर निघाली, रोहित आर्यच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नक्की काय?
रोहित आर्य सामना: मुंबईतील पवई परिसरात एका स्टुडिओमध्ये 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य (Rohit Arya) याचा पोलिसांकडून एन्काऊंटर (Encounter) करण्यात आला. रोहित आर्यवर शनिवारी पहाटे पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीवेळी केवळ पाच जण उपस्थित होते. त्यात त्याची पत्नी, मुलगा, मेव्हणा आणि इतर दोन जवळचे नातेवाईकांचा समावेश होता. तर रोहित आर्यच्या मृतदेहावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात (J J Hospital) शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल (Postmortem report) आता समोर आला आहे.
Rohit Arya Encounter: शवविच्छेदन अहवालात काय उघड झाले?
रोहित आर्यचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. रोहित आर्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. रोहित आर्यच्या छाती आणि पाठीतून गोळी आरपार गेल्याची जखम आढळून आली आहे. छातीत गोळी मारल्यानंतर ती थेट पाठीतून बाहेर पडली, त्यामुळे त्यांची जिवंत राहण्याची काहीच संधी नव्हती. परिणामी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाचे एक्स-रे काढण्यात आले, तसेच संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओद्वारे चित्रीत करण्यात आली. पुढील रासायनिक परीक्षणासाठी व्हिसेरा नमुने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, एन्काऊंटरनंतर तब्बल 24 तासांहून अधिक काळ रोहित आर्यच्या कुटुंबीयांशी पोलिसांचा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे शवविच्छेदन उशिरा करण्यात आले. अखेर शुक्रवार सायंकाळी नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली.
Rohit Arya Encounter: नेमकं काय घडलं होतं?
रोहित आर्या हा महाराष्ट्र सरकारसाठी ‘स्वच्छता मॉनिटर’ या मोहिमेवर काम करत होता. या प्रकल्पासाठी त्याने स्वतःच्या खिशातून तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च केला होता. परंतु सरकारकडून थकबाकीची रक्कम परत मिळत नसल्याने तो मानसिक तणावाखाली होता. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्याने मुंबईतील पवईतील एका स्टुडिओमध्ये लघुपट ऑडिशनच्या नावाखाली राज्यभरातील मुलांना बोलावले. या ठिकाणी त्याने 17 अल्पवयीन मुलांना बंदिस्त करून ठेवले आणि सरकारने देयकाची रक्कम द्यावी, अशी मागणी केली. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) कारवाई करत आर्यचा एन्काऊंटर केला. त्याचवेळी झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.