मी फिर्यादी असूनही मलाच मारहाण, 400 कोटींच्या कंटेनर चोरी प्रकरणातील तक्रारदाराचे पोलिसांवर गंभ

नाशिक कंटेनर लूट प्रकरण : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी आणि अपहरण प्रकरणात आता नाट्यमय वळण आले आहे. अपहरणाचा गुन्हा दाखल करणारे फिर्यादी संदीप पाटील (Sandeep Patil) यांनीच आता पोलिसांवर गंभीर आरोपांची मालिका केली असून, न्याय मागण्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालय गाठण्याची तयारी केली आहे.

Nashik Container Loot Case : “मी फिर्यादी असूनही पोलिसांनी मलाच मारहाण केली”

संदीप पाटील यांनी केलेल्या आरोपांनुसार, या प्रकरणात ते फिर्यादी असतानाही पोलिसांनी त्यांनाच मारहाण केली, शिवीगाळ केली आणि बेकायदेशीररित्या डांबून ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणासाठी नेमण्यात आलेल्या SIT चे प्रमुख आदित्य मिरखेलकर यांनीच आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. तसेच, “मुख्य आरोपींना पाठीशी घालत मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे,” असा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Nashik Container Loot Case : 400 कोटींच्या कंटेनर लुटीचा दावा कसा पुढे आला?

या प्रकरणाची सुरुवात कर्नाटकातील चोरला घाट परिसरात 2 हजार रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला, तब्बल 400 कोटी रुपये किमतीचा कंटेनर चोरीला गेल्याच्या दाव्यापासून झाली होती. या कथित लुटीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकासह इतरांनी आपले अपहरण केल्याचा आरोप करत संदीप पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. प्रचंड रकमेचा उल्लेख असल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले.

Nashik Container Loot Case : SIT तपासात उघड झाल्या विसंगती

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी SIT स्थापन केली. या तपासात कॉल डिटेल्स, लोकेशन डेटा, सीसीटीव्ही फुटेज आणि कथित घटनाक्रमाचा सखोल अभ्यास करण्यात आला. तपासादरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीत आणि तांत्रिक पुराव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्या. अखेर, अशी कोणतीही कंटेनर लूट किंवा अपहरण प्रत्यक्षात घडलेच नसल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nashik Container Loot Case : सात जणांना अटक, पण न्यायालयातून निर्दोष मुक्तता

या प्रकरणात पोलिसांनी किशोर सावला, विराट गांधी, जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, मच्छिंद्र मढवी आणि जनार्दन धायगुडे अशा सात जणांना अटक केली होती. मात्र, न्यायालयात सरकारी पक्ष आरोपींविरोधात ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर करू शकला नाही. परिणामी, इगतपुरी न्यायालयाने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Nashik Container Loot Case : पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

न्यायालयीन निकालानंतर मुक्त झालेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत, खोटी तक्रार दाखल होण्यामागे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, तसेच खोटी तक्रार देऊन यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी संदीप पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.

Nashik Container Loot Case : आता उच्च न्यायालयात लढाई

दरम्यान, संदीप पाटील यांनी पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीविरोधात आणि आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 400 कोटींच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

Nashik News: नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?

आणखी वाचा

Comments are closed.