दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय…; संजय राऊतांनी मविआच

मुंबई : राज्यसभेची (Rajyasabha) निवडणूक जाहीर झाली असून याच महिन्यातील 16 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुतीकडे 6 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळणार आहे. त्यामध्ये, भाजपला 4 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना उमेदवारांची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष आग्रही असल्याचे पाहायला मिळालं. त्यात, संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना आणि काँग्रेसच जास्त आग्रही होती. मात्र, महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा होती, मात्र अद्यापही महाविकास आघाडी कडून कोणत्याही नावांची अधिकृत घोषणा झालेली नाही, अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, निर्णय जाहीर करणं कोणत्याही एका पक्षाच्या हातात नाही. तीन पक्ष एकत्रित येऊन  त्यासंदर्भात अंतिम निर्णय होईल आणि मग तो निर्णय जाहीर होईल. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे. त्यांच्याशी वारंवार चर्चा होत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा केली. तिनही पक्षांमध्ये चर्चा, संवाद सुरू आहे, तो संपलेला नाही, चिंतेचं कारण नाही. जे काही होईल ते एकमतानेच होईल. तीन पक्ष तर स्वतंत्र पक्ष उभारू शकत नाहीत. एकच उमेदवार उभा राहिलं. तो उमेदवार तीन पक्षाच्या संमतीने दिला जाईल, सातवी जागा ही महाविकास आघाडी म्हणूनच जिंकली जाईल, आणि आम्हाला त्यामध्ये कोणतीही अडचण दिसत नाही, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

सातवी जागा महाविकास आघाडी म्हणूनच जिंकेल आणि ती जागा एकत्र असेल तर निवडून येईल. शिवसेना मोठा पक्ष आहे, आता एकत्र राहणं गरजेचं आहे. उद्या महत्त्वाचा दिवस आहे. काल जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. चर्चा झाली आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा होत आहे. एकच उमेदवार उभा राहिल आणि तो एकत्र चर्चा करून उभा राहिलं, असंही पुढे ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजप शरद पवारांच्या उमेदवारीसाठी पडद्यामागून आग्रही??

* शरद पवारांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीमध्ये पक्षांच्या काही नेत्यांमध्ये नाराजी उफाळू शकते आणि आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते.
* शरद पवारांना उमेदवारी दिल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचे महाविकास आघाडी मध्ये संख्याबळ जास्त असताना सुद्धा उमेदवारी पासून दूर ठेवण्यास भाजपला यश मिळेल.
* काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी राज्यसभेची उमेदवारी आवश्यक असताना शरद पवारांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसला यामुळे फटका बसू शकतो, हे भाजपला राज्यसभेसाठी महत्त्वाचा असेल.
* विलीनीकरणाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांची सुरू असताना शरद पवारांना उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा संभ्रम कायम राहू शकतो आणि हे महायुतीसाठी फायद्याचा ठरू शकतो.
* महाविकास आघाडी कडून शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास महायुतीकडून सुद्धा सातवा उमेदवार दिला जाऊ शकतो… त्यामुळे उमेदवारी महायुतीने सुद्धा जाहीर करण्यासंदर्भात वेट अँड  वॉच ची भूमिका ठेवली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.