मोदी-शहा लोकलज्जेखातर 20 दिवसांनी संसदेत आले अन् मुखदर्शन देऊन पळून गेले; संजय राऊत यांचा घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा 20 दिवसांनी लोकलज्जेखातर संसदेत आले. शेवटी वंदे मातरम् होते तेव्हा यावेच लागते. त्या तीन मिनिटांसाठी ते खाली मान घालून आले आणि मुखदर्शन देऊन पळून गेले. 56 इंच वगैरे काही नाही. मैं हू… वगैरे विषय संपला असून आता दिल्ली खाली करायची वेळ आली आहे, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शुक्रवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.
Comments are closed.