मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा


अजित पवार सोलापुरात प्रत्येकाचा एक काळ असतो. दरवेळी दमदाटी करुन चालत नाही. प्रत्येकाचा फुगा हा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढले जाते, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील (Rajan Patil) यांना लक्ष्य केले. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत (Angar Nagarpanchayat Election) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांनी अनेक वर्षांपासून सत्ता आहे. राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीमधील 17 जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या. मात्र, नगराध्यक्षपदी राजन पाटलांची सून रिंगणात असताना अजित पवार गटाकडून उज्वला थिटे (Ujjwala Thite) यांना रिंगणात उतरवले होते. उज्वला थिटे यांना उमेदवारी अर्जच भरता येऊ नये, म्हणून अनगरमध्ये दहशतीचे राजकारण झाल्याची चर्चा होती. शेवटी निवडणूक अधिकाऱ्यांनी नाट्यमयरित्या उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरला होता. याविरोधात उज्वला थिटे कोर्टात गेल्या होत्या, परंतु, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. यानंतर उज्वला थिटे यांनी आपण राजन पाटील यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) हे गुरुवारी सोलापूरमधील वडाळा येथील कार्यक्रमाला हजेरी लावल्या होती. या कार्यक्रमात अजित पवारांच्या हस्ते उज्वला थिटे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अजित पवार यांनी राजन पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. उज्वला थिटे इथे बसल्या आहेत, त्यांच्याबाबतीत काय झालं आपण बघितलं.  आपल्याकडे लोकशाही आहे. संविधान, कायदा हा सर्वांना सारखा आहे. सर्वांना निवडणुकीत उभं राहायचं अधिकार आहे. दमदाटी करून चालत नाही. प्रत्येकाचा फुगा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढले जाते, अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली.  हे जे दमदाटी तुम्ही सर्वांनी म्हटलं, पण ज्या गावचं बोरी त्याचं गावचं बाभळी असतात. कोणी अरे केलं तर कारे करणारे असतात. आमच्या लाडक्या बहिणी इथं आहे. उज्वला थिटेही इथे आहे. भाऊ म्हणून आम्ही कायम आमच्या बहिणीचं संरक्षण करण्याच काम केले. पुढच्या निवडणुकीत चांगल्या विचारांच्या लोकांना पुढे येऊ द्या.  नव्याना संधी द्या आणि जुन्याचा अनुभवदेखील घ्या, असे अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना सांगितले.

उज्वला ताई, आम्ही कायम महिलांचा सन्मान करणारे आहोत. महिलांना संधी दिल्यास ते सोनं करतात. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथं महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं. पवार साहेबांनी सुरवात केली, त्यात आम्ही भर घातली. म्हणूनच आम्ही लाडकी बहिणी योजना सुरु केली, ज्याची चर्चा झाली. महिला थोड्या प्रमाणात का असेना स्वयंपूर्ण झाल्या. 45 हजार कोटी रुपये चांद्यापासून बांदापर्यंत देतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

माझं संतोष देशमुखांसारखं झालं तर माझा मुलगा पाटील कुटुंबाशी लढेल; कोर्टाच्या निकालानंतर उज्ज्वला थिटे आक्रमक

आणखी वाचा

Comments are closed.