अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण
अंडाज समिती मुंबई : अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीची थाळीतून झाल्याचे समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संसदेच्या अंदाज समितीची महाराष्ट्र विधिमंडळात दोन दिवसांची परिषद होती. मात्र यात आमदार-खासदार आणि अधिकाऱ्यांना पंचपक्वान थेट चांदीच्या थाळीतून वाढण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या चांदीच्या थाळीच भाडं 550 रुपये आहे. तर त्यामधील पंचपक्वान जवळपास साडेचार हजार रुपयांचं असल्याचेही बोललं जात आहे. म्हणजेच एका थाळीची किंमत पाच हजाराहून अधिक असल्याचं पाहायला मिळतंय.
हा तर पेशवाईतील जेवणाचा थाटच!- सचिन खरात
दरम्यान, याच मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्याचे समोर आलं आहे. अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण देणे हा तर पेशवाईतील जेवणाचा थाटच असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य 250 आणि अधिकारी 350 असे एकूण सहाशे अतिथी या परिषदेला होते. तर या पूर्वी या परिषदे दरम्यान मराठीत मजकूर न लिहिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता, तर महाराष्ट्र अंदाज समितीचा दौरा सुरु असताना धुळे प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळे अंदाज समिती आणि वाद असं समीकरण झाल की काय? असा प्रश्न देखील या निमित्याने विचारला जातोय
नशीब सोन्याचा चमचा नाही दिला – संजय राऊत
महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. धुळ्याच्या विश्राम गृहात जी मोठी रक्कम पकडली त्या आधी दहा कोटी रुपये जालन्याला गेले, हे आमच्या अंदाज समितीचे अध्यक्ष यांचे कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे त्यांना चैनबाजीची चटक लागलेली आहे. खरं म्हणजे अंदाज समितीच्या बैठकीला बसायला त्यांना दिलं नाही पाहिजे होतं. त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे. दरम्यान देशभरातून आलेल्या सर्व सदस्यांना सोन्याचा चमचा नाही दिला हे नशीब, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याच्या घास तुला भरविते, भ्रष्टाचार मुक्त नेत्याचे फडणवीस हे त्या सगळ्या मोत्याचा घास भरवत आहेत, हे चित्र आम्ही या पूर्वी कधी पाहिलं नाही, असेही ते म्हणाले.
तर स्वतः हे राज्यकर्ते या लुटीचे वाटेकरी आहे. त्याशिवाय गप्पा बसणार नाही. हे अशा भ्रष्ट अंदाज समितीचा अध्यक्ष आहे आणि ज्या पद्धतीने ते कार्यक्रमात मिरवतात हे महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांची कारकीर्दीला देखील कलंक आहे. अशी बोचरी टीका ही खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=B0YMM66ECF0
हे ही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.