अंगकृष रघुवंशी OUT की NOT OUT?, विकेटचा असा कोणता नियम जो कोणालाच कळला नाही, कोच नायर थेट अंपाय

आंगकृष्ण रघुवंशी क्षेत्राच्या नियमात अडथळा आणत आहे : आयपीएल2026 मध्ये रविवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात अंगकृष रघुवंशीच्या (Angkrish Raghuvanshi) विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला. कोलकात्याच्या डावातील पाचव्या षटकात प्रिन्स यादवने गोलंदाजी करत होता. रघुवंशीने चेंडू मिड-ऑनच्या दिशेने खेळला आणि धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. मात्र कॅमेरॉन ग्रीनने त्याला परत पाठवलं.

रघुवंशी परत क्रीजकडे धावत असताना फील्डरचा थ्रो आला आणि चेंडू त्याच्या पायाला लागला. याच वेळी ऋषभ पंतने जोरदार अपील केलं. मैदानावरील अंपायरने निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. थर्ड अंपायरने निरीक्षण करताना सांगितलं की रघुवंशीने परत येताना आपली दिशा बदलली आणि त्यामुळे चेंडू स्टंप्सवर जाण्यापासून अडथळा निर्माण झाला. त्यामुळे नियमांनुसार त्याला बाद देण्यात आलं.

वाद का पेटला?

क्रिकेटच्या नियमांनुसार, जर फलंदाजाने जाणीवपूर्वक चेंडू आणि स्टंप्स यांच्या मध्ये येऊन थ्रो अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आउट दिलं जाऊ शकतं. मात्र या प्रकरणात चेंडू थेट स्टंप्सला लागलाच नव्हता, त्यामुळे हा निर्णय वादग्रस्त ठरला. रघुवंशी स्वतःही या निर्णयावर नाराज दिसला. तो बराच वेळ अंपायरशी चर्चा करत राहिला. परतताना त्याने बॅट जमिनीवर आपटली आणि हेल्मेटही काढून फेकलं.

अभिषेक नायरही संतापला

दरम्यान, केकेआरचा मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर पण संतापला होता. तो बाउंड्री लाईनजवळ उभ्या असलेल्या अंपायरशी वाद घालताना दिसला. तसेच केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन हेही थर्ड अंपायरचा निर्णय ऐकून आश्चर्यचकित झाले.

नियम काय आहे? (Obstructing the Field Rule)

क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणात अडथळा आणणे (Obstructing the Field) हा एक असा नियम आहे, ज्या अंतर्गत फलंदाजाने जाणीवपूर्वक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला (Fielding Team) अडथळा निर्माण केल्यास त्याला आऊट दिले जाते.  जर फलंदाजाने जाणीवपूर्वक आपल्या कृतींनी क्षेत्ररक्षकाला धावबाद (Run out) करण्यापासून किंवा कॅच घेण्यापासून रोखले, तर तो ‘क्षेत्ररक्षणात अडथळा आणणे’ नियमांतर्गत आऊट मानला जातो. धावताना जर फलंदाजाने अवाजवीपणे आपली दिशा बदलली आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला रन आउट करण्यात अडथळा आला, तर अंपायर त्याला आऊट देऊ शकतात. यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अंपायरकडे अपील (Appeal) करावे लागते.

हे ही वाचा –

Angkrish Raghuvanshi Wicket Controversy : अंगकृष रघुवंशीच्या वादग्रस्त विकेटवरून राडा; बॅट-हेल्मेट दिले फेकून, तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर गदारोळ, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.