भिवंडीतील ठाणे बायपास रोडवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू
भिवंडी अपघात बातम्या: भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील बॉम्बे ढाबा या ठिकाणी एक अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात भिवंडीतील (Bhiwandi News) दोघा दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद असद अफताब आलम (रा.गैबी नगर) आणि आजम सईद अन्सारी (रा.अन्सार नगर) असे या दोघा मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद असद आफताब आलम आणि आजम सईद अन्सारी असे दोघे रात्री उशिरा भिवंडीहून मुंब्राकडे दुचाकीवर जात होते. त्या दरम्यान, भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खारेगाव टोलनाका येथील बॉम्बे ढाबा परिसरता भरधाव कंटेनर चालकाने दुचाकीस दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे युवक खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने दोघं गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच या जखमींना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जबर मार बसल्याने तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र धडक दिल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. सध्या पोलीस या फरार चालकाचा ही शोध घेत आहेत.
गुवाहाटी एअरपोर्टवर मुंबईचे प्रवासी अडकले
गुवाहाटीहून मुंबईला येण्यासाठी सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांचं अकासा एअरलाइन्सचं विमान आहे. या विमानाने येण्यासाठी गुवाहाटीला गेलेले मुंबईकर प्रवासी शनिवारी दुपारीच विमानतळावर दाखल झाले. सुरुवातीला हवामान खराब आहे, तसंच इतर तांत्रिक कारणं देत विमान उशिराने असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मात्र रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतरही विमान उपलब्ध होत नसल्याने अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि अकासा एअरलाइन्सने त्यांना विमान रद्द झाल्याची माहिती दिली.
पायलट आणि केबिन क्रू नसल्यामुळे आता उड्डाण होऊ शकत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यावर प्रवाशांनी संताप व्यक्त करताच आजची रात्र तुमची हॉटेलमध्ये सोय करतो आणि उद्या सकाळच्या विमानाने तुम्हाला मुंबईला पाठवलं जाईल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. मात्र यावरही अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त करत थेट विमानतळातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यावर एअरलाइन्स स्टाफ आणि सीआयएसएफने प्रवाशांची समजूत काढत त्यांना सकाळच्या विमानाने जाण्याची विनंती केली आणि सकाळी साडेआठ वाजताच्या विमानाने हे प्रवासी अखेर मुंबईला रवाना झाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.