मोठी बातमी : क्रिकेटच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड तुटले, 50 षटकात 574 धावा, वैभव सूर्यवंशीसह तिघ

बिहारने विजय हजारे ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. बिहार संघाने क्रिकेट इतिहासात नवा सुवर्णअध्याय लिहिला आहे. विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात बिहारने 50 षटकांत 6 गडी गमावत तब्बल 574 धावा ठोकल्या. या डावात 3 फलंदाजांनी शतके ठोकली. हा लिस्ट-ए क्रिकेटमधील आजवरचा सर्वोच्च संघ स्कोअर ठरला आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध बिहारच्या फलंदाजांनी खळबळ उडवून दिली.

वैभवची वादळी खेळी, तीन वर्षांनंतर तुटलेला विक्रम

सलामीवीर वैभव सूर्यवंशीने पहिल्या विकेटसाठी 158 धावांची भक्कम भागीदारी रचली. त्याने अवघ्या 84 चेंडूमध्ये 190 धावांची खेळी खेळली.  यापूर्वी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तमिळनाडूच्या नावावर होता. 2022 मध्ये तमिळनाडूने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 2 गडी गमावत 506 धावा केल्या होत्या. तब्बल तीन वर्षांनंतर बिहारने हाच संघ पराभूत करत तो विक्रम मोडीत काढला. या यादीत बिहार आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

एका डावात तीन शतके

बिहारकडून तीन फलंदाजांनी शतकी खेळी करत सामन्यावर वर्चस्व गाजवले.  प्रथम, वैभव सूर्यवंशीने 190 धावा केल्या. त्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज आयुष लोहारुकाने 116 धावा केल्या. त्यानंतर, कर्णधार साकिबुल गनीने फक्त 40 चेंडूत 128 धावा केल्या. बिहारच्या डावात 49 चौकार आणि 38 षटकारांचा समावेश होता. याचा अर्थ बिहारने केवळ चौकारांच्या मदतीने 377 धावा केल्या.

वैभव सूर्यवंशी – पहिल्या दिवसाचा खरा हिरो

हा दिवस पूर्णपणे वैभव सूर्यवंशीच्या नावावर राहिला. 14 वर्षे आणि 272 दिवस वयात शतक झळकावून तो पुरुषांच्या लिस्ट-ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. हा त्याचा लिस्ट-ए क्रिकेटमधील अवघा सातवा सामना होता. त्याने डिसेंबर २०२४ मध्ये मध्य प्रदेशविरुद्ध पदार्पण केले होते.

प्लेट लीग सामन्यात वैभवने केवळ 36 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. सीनियर क्रिकेटमधील (टी-20 वगळता) हे त्याचे पहिले शतक होते. त्यानंतर त्याने 59 चेंडूंमध्ये लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात जलद 150 धावा पूर्ण करत नवा विक्रम रचला. 84 चेंडूमध्ये 190 धावा करताना त्याच्या खेळीत 16 चौकार आणि 15 षटकार समाविष्ट होते. एकूणच, बिहार संघाची ही कामगिरी आणि वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये दीर्घकाळ लक्षात राहणारी ठरणार आहे.

विजय हजारे ट्रॉफीमधील सर्वाधिक धावा

  • बिहार ५७४* वि अरुणाचल प्रदेश, २०२५
  • तमिळनाडू 506/2 विरुद्ध अरुणाचल प्रदेश, 2022
  • मुंबई ४५७/४ वि पाँडिचेरी, २०२१
  • महाराष्ट्र 427/6 विरुद्ध मणिपूर, 2023
  • पंजाब ४२६/४ वि हैदराबाद, २०२५

हे ही वाचा –

Vaibhav Suryavanshi News : 15 षटकार, 16 चौकार,  84 चेंडूत 190 धावा… वैभव सूर्यवंशीने आतापर्यंतचे सगळेच रेकॉर्ड मोडले, क्रिकेट विश्वात खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.