वारीसंदर्भात अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर

अबू आझमीवर फड्नाविस व्हा: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वारीमुळं रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही असे वक्तव्य आझमी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे. वादग्रस्त विधान केले की प्रसिद्धी मिळते असे त्यानं वाटते. त्यामुळं अबू आझमी यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नसल्यामुळं त्यांच्या फालतू वक्तव्याला उत्तर देणार नाही असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या हैदराबाद हाऊस मध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते विकासावर बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री गिरीश महाजन, मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते .

कुंभ मेळाव्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोड नेटवर्क तयार करण्यासाठी ही विनंती केली होती. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बैठक घेत प्रमुख आठ रस्ते बनवण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर ते नाशिक नागपूर ते नाशिक, नाशिकला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांसंदर्भात तसेच अंतर्गत रस्त्या संदर्भात बैठक पार पडली. या सगळ्या रस्त्यांना मान्यता निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल असे फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्याच्या काळात जे काय ट्रॅफीक उपस्थित होणार आहे. त्याचाही मार्ग, द्वारका सर्कल सुद्धा दोन फेज केला जाणार आहे. पहिल्या फेजमध्ये कुंभ सुरु होण्यापूर्वी केला जाईल. तर दुसऱ्या फेजमध्येही काम केले जाणार आहे. नाशिक आणि त्रंबक हा रस्ता जोडला जाणार आहे. काही ठिकाणी सहा पदरी तर काही ठिकाणी चार पदरी यांचा रोडला मान्यता दिली आहे.

राहुल गांधींना मेक इन इंडिया माहित नाही

नागपूरच्या विविध प्रकल्पांच्या संदर्भातही आढावा घेतल्याचे फडणवीस म्हणाले. नाग नदीवर एसटीपी करण्याचा अनुषंगाने अंडरग्राउंड वीज, वाहन तळासाठी शहराबाहेर वाहनतळ सगळ्या विषयावर चर्चा झाल्याचे फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांना देशात काय बनते हे माहीत नाही. मेक इन इंडिया राहुल गांधी यांना माहित नाही. जोपर्यंत कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ही अकरावी अर्थव्यवस्था होती. मागील दहा ववर्षात भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली आहे. राहुल गांधी यांनी याचा होमवर्क करावा असेही फडणवीस म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=RqHgkjeit5o

महत्वाच्या बातम्या:

वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही; अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद

आणखी वाचा

Comments are closed.