गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज,23 जूनपासून बुकिंग करता येणार, जाणून घ्या सविस्तर

गणपती फेस्टिव्हल ट्रेन तिकिट बुकिंग मुंबई: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत राज्यात मोठा उत्साह पाहायला मिळतो. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात चाकरमानी दरवर्षी मुंबईतून दाखल होत असतात. मुंबईत कामानिमित्त स्थायिक झालेले कोकणाताली नागरिक गणपतीच्या सणासाठी गावी जात असतात. यासाठी ते रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांचा वापर करतात. यंदा गणपतीचं आगमन 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वी 22,23, आणि 24 ऑगस्ट रोजी अनुक्रमे शुक्रवार, शनिवार आणि रविवार असल्यानं कोकणात जाणाऱ्यांसाठी हे दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेनं प्रवास करायचा असल्यास आगाऊ आरक्षण करायचं असल्यास तो कालावधी दोन महिने निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळं 22 ते 24 ऑगस्टच्या दरम्यान कोकणात ज्यांना जायचं आहे. ते 23 जूनपासून रेल्वेच्या तिकिट आरक्षित करु शकतात. एसटी आणि खासगी वाहनांच्या तुलनेत कोकणात जाण्यासाठी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिलं जातं.

कोकणात ज्यांना रेल्वेनं जायचं आहे ते 22 ऑगस्टचं तिकीट 23 जून, 23 ऑगस्टचं तिकीट 24 जून,24 ऑगस्टचं 25 जून, 25 ऑगस्टचं 26 जून, 26 ऑगस्टचं  27 जून,  27 ऑगस्टचं तिकीट 28 जून, 28 ऑगस्टचं तिकीट 29 जून रोजी बुकिंग करता येईल.

रेल्वेच्या तिकिटांचं बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत मोबाईल अॅप आणि वेबसाईटवरुन करता येते. याशिवाय ट्रेन कुठं पोहोचली आहे हे जाणून घेण्यासाठी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाईल अॅपचा वापर करता येऊ शकतो.

तिकीट बुक करताना कोणत्या स्टेशनवरुन निघायचं आणि कोणत्या स्टेशनवर उतरायचं यासंदर्भातील विचार करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील स्टेशनवर उत्तर भारतातून येणाऱ्या आणि दक्षिण भारतातून येणाऱ्या ट्रेनचं बुकिंग एक दिवस अगोदर करावं लागेल. म्हणजेच जर तुम्ही 26 ऑगस्टला कल्याणहून खेड, चिपळूण, कणकवलीजाणार आहात तर त्याचं बुकिंग 26 जून पासूनच करु शकता. याशिवाय जर तुम्ही 3 सप्टेंबर 2025 ला कुडाळ, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड हून पनवेल, कल्याण आणि मुंबईला येणार असाल तर 4 जुलैपासून बुकिंग करु शकता.

रेल्वे तिकीट बुक करताना एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे ती म्हणजे रात्री 12 वाजल्यानंतर दिवस बदलतो. त्यानंतर सुरुवातीची 20 मिनिटे तिकीट आरक्षित करता येत नाही. त्यामुळं तिकिट बुक करताना  ही बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याशिवाय आयआरसीटीसीच्या नव्या नियमानुसार तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.