नमाज पडायला दुसरीकडे जागा नाही का? हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा बोललं तर चालेल का? शनिवारवाडा प
Nitesh Rane On Shaniwar Wada Namaj Pathan Controversy: शनिवारवाड्यात (Shaniwar Wada) महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. शनिवारवाड्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) प्रचंड आक्रमक झाल्या. पतीत पावन संघटना व मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला. तसेच या परिसरात गोमुत्रही शिंपडण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या सगळ्याला मज्जाव केल्याने पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाची देखील झाली होती. आता यावरून मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
नितेश राणे शनिवार वाड्यावर नमाज पठण: हनुमान चालिसातून हाजी अली पण चालेल?
नितेश राणे म्हणाले की, नमाज पडायला यांना दुसरीकडे जागा नाही का? उद्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटले तर चालेल का? शनिवार वाडा हे आमच्यासाठी हिंदू समाजाचे प्रतीक असलेले धार्मिक स्थळ आहे. तिथे जर तुम्ही नमाज पठण करत असाल तर उद्या हाजी अलीला आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचे पठण सुरू केले तर मग काय करायचे. जो न्याय तुम्ही हाजी अलीला लावता तोच अन्य धार्मिक स्थळांना देखील लावा. वातावरण कोण खराब करत आहेत? कशाला तिथे नमाज पडायचे आहे. नमाज पडण्यासाठी देशात आणि राज्यात जागा कमी आहे का? वातावरण खराब करणारे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. मग हिंदू संघटनांनी आवाज उचलला तर त्यात चूक काय? जो आवाज आमच्या कार्यकत्यांनी उचलला तो बरोबर आहे, असे त्यांनी म्हटले.
Nitesh Rane on Raj Thackeray: मग व्होट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत?
राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुकांसाठी 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केला. निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी देखील केली. याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले की, राज ठाकरे हे मुद्देसूद बोलतात. त्यांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर येते त्यावर लोक विचार करतात, असा आतापर्यंत अनुभव आहे. पण, कालच्या झालेल्या सभेनंतर अशा पद्धतीचे व्होट चोरीचे आरोप हे लोकसभेनंतर का झाले नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Nitesh Rane on Raj Thackeray: राज ठाकरे निकाल
नितेश राणे पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने लोकसभेत एका-एका मतदारसंघात लाख-दीड लाख मतदान झाले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जिंकून आले. तेव्हा व्होट चोरीचे, व्होट जिहादचे कोणीच आरोप केले नाहीत. जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले. पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं. तेव्हा त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही. लोकसभेनंतर हिरवा गुलाल उधाळला गेला त्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने हिंदुत्व विचारांचे सरकार येण्यासाठी भगव्या गुलालाने दिले. तेव्हाच आता व्होट चोरीचे आरोप व्हायला लागले. राज ठाकरे आजकाल ज्यांचा मांडीला मांडी लावून बसतात, त्या संगतीचा हा परिणाम असू शकतो. कारण उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेले आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.