उनाथ शिंदे ऑन उधव शॉकरे: उदव ठाकरे महनाले, हक्क नाही

उनाथ शिंदे ऑन उधव शॉकरे: उदव ठाकरे महनाले, हक्क नाही

मुंबई : उठण्याची भाषा कोण करतंय, त्यासाठी मनगटात जोर लागतो,  फक्त तोंडाच्या वाफा सोडून उपयोग नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तीन वर्षांपूर्वी आपण उठाव केला, त्यातून हे आडवे झाले. आता उठण्यासाठी कुणाचातरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीकाही शिंदे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग मारत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. गद्दार कायम झुकलेलेच असतात, उठेगा नही साला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं.

तीन वर्षांपूर्वी धो डाला, अब उठेगा नही साला

एकनाथ शिंदे म्हणाले की, “तीन वर्षांपूर्वी उठाव केला. त्यावेळी दाढीवरुन अर्धाच हात फिरवला होता. त्यावेळी ते आडवे झाले. त्यातून सावरले नाहीत. आता उठण्यासाठी कुणाचा तरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उठण्याची भाषा त्यांनी करू नये.”

एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. दुसऱ्याने मात्र सत्तेची मळमळ बोलून दाखवली. कोणत्याही पक्षाचा झेंडा आणि अजेंडा नको असं ठरलं होतं. ते फक्त एकाने पाळलं. दुसऱ्याने मात्र स्वार्थाचा अजेंडा राबवला असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला.

Comments are closed.