कधी गार, तर कधी गरम पाणी…; सिनिअर्सकडून रॅगिंग, पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील घटनेने सर
पुणे: पुण्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या व्यक्तीच्या नातवावर पुण्यातील बी.जे. मेडीकल वैद्यकिय महाविद्यालयात रॅगींगचा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. हा मुलगा बीजे मेडीकल वैद्यकीय महाविद्यालयात एम एस होण्यासाठी आर्थोपेडीक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. याच डीपार्टमेंटमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर रॅगींग केल्याचा आरोप आहे. दरम्यान याबाबतची तक्रार देऊन देखील त्याकडे पुरेशी दखल घेतली नाही, असा या विद्यार्थ्याचा आरोप आहे.
कधी गार पाणी तर कधी गरम…
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या मुलाला त्यांचे दोन सिनिअर्स डीपार्टमेंटमधे डोक्यावरुन कधी गार पाणी ओतून घ्यायला लावायचे, तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावायचे. या मुलाने ही गोष्ट आधी आर्थोपीडीक डीपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉक्टर गीरीष बारटक्के यांना सांगितली होती. मात्र त्यांनी पुरेशी दखल घेतली नाही, असा या मुलाचा आरोप आहे. त्यानंतर ससून रूग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांना देखील ही बाब सांगण्यात आली. मात्र त्यांनीही पुरेशी दखल न घेतल्याने मुंबईला वैद्यकिय शिक्षण विभागाकडे दाद मागण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर दोन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी म्हणजे अभ्यासक्रमाच्या एका टर्मसाठी निलंबीत करण्यात आलं आहे.
मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार
ससूनचे अधिष्ठाता डाॅ. एकनाथ पवार यांनी देखील या प्रकरणावर मौन बाळगलं असून त्यांची देखील कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मात्र माहिती बाहेर येवू नये यासाठी महाविद्यालयाकडून खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली असल्याने प्रकरणाची माहिती बाहेर आल्याची चर्चा आहे.
बी जे महाविद्यालयातील ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. अनेक दिवस या विद्यार्थ्याला त्रास होत होता अशी माहिती समोर आली आहे. संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी याची तक्रार थेट मंत्रालय स्तरावर केली होती. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केली तक्रार त्यानंतर चक्र फिरली आणि खडबडून जागे झालेल्या कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये तक्रारदार विद्यार्थ्यांकडून आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे या विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिक पाहा..
Comments are closed.