‘जोपर्यंत मन आणि आत्मा साफ आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही’, देवेंद्र फडणवीसांच्या समोर रणजितस
मुंबई : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात (Satara Doctor Suicide) ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. यावरुन काही लोक गलिच्छ राजकारण करु पाहत आहेत. त्या डॉक्टर महिलेचा जीव गेला, त्या बिचारीने कशासाठी जीव दिला याचे संशोधन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात काही झालं तरी कुठलीही दु:खद घटना घडली राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप होतात. तसंच इथं काही घडलं तरी आमच्या नावाची बदनामी करायची ही एक फलटणची अनभिषिक्त परंपरा झाली आहे. आम्ही फलटणकर याला भीक घालत नाही. भगिनीचा जीव गेल्यानंतर कोणाला यामधून राजकारण करायचं आहे तालुक्याला कळून आलं आहे. विरोधक मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले होते, तरीदेखील अंबादास दानवेंनी त्यांच्यावरती सोशल मिडीयावरती पोस्ट करत हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना याप्रकरणी भाष्य केलं आहे, तर जोपर्यंत मन आणि आत्मा साफ आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही,असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
Ranjit Naik-Nimbalkar Phaltan : मी कधी कोणाशी मस्तीत वागलो नाही
कितीही वाईट आरोप झाले तरी कुणाला घाबरणार नाही. दोन दिवसांपूर्वी फलटणमध्ये एक प्रसंग घडला. दोन ते तीन दिवसांपूर्वी एका बहिणीचा मृत्यू झाला. तिने मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं. आपण इथे येणार होतात, आपण येऊ नयेत त्यामुळे माझ्यावरती गलिच्छ स्वरूपाचे आरोप झाले. या सर्व लोकांना परिस्थिती माहिती आहे,रणजितसिंह नाईक निंबाळकर कधीही चुकणार नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी काम करतो आहे. हजारो शेतकऱ्यांच्या दहा लाख दुध संकलंन केलं. एकाही शेतकऱ्याचा एकही रूपया खाल्ला नाही. मी कधी कोणाशी मस्तीत वागलो नाही, कधी कोणाला वाईट शब्द बोललो नाही. इथे अधिकारी आहेत, त्यांना कधी ब्र शब्दाने कधी बोललो नाही, जोपर्यंत मन आणि आत्मा साफ आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही, उनकी खुदकी लंगोटी फटी है और हमारे उपर किचड उछालने मे लगे है! असं म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या समोरच निंबाळकरांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
Devendra Fadnavis: ‘मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो’
परवा आमची एका लहान बहीण डॉ. संपदा मुंडे यांचा अतिश्य दुर्दैवी मृत्यू झाला, त्या भगिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचं कारणही आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत, त्यांना अटक केली आहे. त्यामधील जवळपास सगळं सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा निर्णय आम्ही घेतला. अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवलं जातं, तशाचप्रकारचा निंदनीय प्रयत्न झाला. काहीही कारण नसताना रणजितसिंह निबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो. अशा बाबतीत मी कधीच पक्ष, जात, व्यक्ती आणि राजकारण पाहत नाही. जिथे लहान भगिनची विषय असतो तिकडे मी कोणतीही तडजोड करत नाही. मात्र, मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे प्रकार सुरु आहेत. चुकीच्या गोष्टीला मी कधीही पाठीशी घातलेले नाही आणि जर चुकीचे राजकारण करत असतील तर ते देखील सहन करणार नाही. त्याला उत्तर देणारा मी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.