राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्… र

मुंबई:  “माझी जी ईडीची केस आहे, त्या बाबत सेशन कोर्टमध्ये हजेरी होती. माझी जी केस आहे, त्यात अजितदादांची केस पण आहे. इतरं नेत्याचीही केस आहे. या केसमध्ये बँकेचा विषय आहे, कुठेच काही चुकीचं झालेलं नाही. ईओडब्ल्यूने ईडीला सांगितलं आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. पण ईडीला हा विषय सोडायचा नाहीय. २६ जानेवारीला हा विषय दिल्लीला गेला. दिल्लीतून या प्रकरणात असलेल्या नेत्यांना सोडू नका अशा सूचना आल्या आहेत. या 13 तारखेला कोर्टात ईडीने राज्य सरकार विरोधात विषय मांडला. आम्हाला या विषयात अजून खोलात जाऊन तपासा करायचा आहे. आम्हाला संघर्ष करायचा आहे, मात्र सत्तेत असलेल्यांना वाटेल आम्ही सुटलो असे नाही, आम्ही जिंकणार याचा विश्वास आम्हाला आहे” असं रोहित पवार म्हणाले. “कोड कधी,कधी सुटत नाही. जे लोक आता सत्तेत आहेत, ईडीकडे त्यांचा विषय आहे. पण त्यांचा विषयही आता ईडी का सोडत नाही? हा प्रश्न लोकांना पडलेला आहे. हा विषय जेव्हा दिल्लीत गेला होता, तेव्हा दिल्लीकडून सांगण्यात आलं, जे जे नेते आहेत, त्यांना सोडू नका. कुठेतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात विरोधाभास वाटतो” असं रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.(Rohit pawar)

“विरोधात असल्यामुळे आम्हाला संघर्षच करायचा आहे. पण ज्यांना असं वाटते सत्तेत आहोत म्हणून आम्ही सुटलो. त्यांची उद्या मोठी अडचण होऊ शकते” असं रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतही रोहित पवार बोलले. “टीव्हीवरुन मला ही बातमी कळली. ज्या 35 आमदारांनी सुनेत्राकाकींच नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुरस्कृत केलं, त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय त्या पक्षाचे 32 ते 35 पदाधिकारी, त्यांनी सुद्धा कागदावर सुनेत्राकाकींच नाव स्पष्टपणे लिहिलं. आमदार, पदाधिकारी सर्व सुनेत्राकाकींसोबत आहेत, मी त्या सर्वांच अभिनंदन करतो, आभार मानतो. सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत” असं रोहित पवार म्हणाले.

मुलुंड दुर्घटनेप्रकरणी रोहित पवारांचा संताप

रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी 14 सामान्य लोकांचा मृत्यू झाला होता, एसआयटी स्थापन झाली, पण काय झालं त्यापुढे एसआयटीचं, धुळखात पडली, लोणचं घालायचा आहे का सगळ्या एसआयटीचं? असा विषय आहे त्यामुळे सरकार काय करतं, कुठेतरी एखाद्या विषयावर पडदा टाकण्यासाठी आम्ही तपास करतोय, पण ते मेट्रोचा भाग पडलाच कसा? त्यामध्ये एखाद्या गरीब सामान्य व्यक्तीचा, मध्यमवर्गीयाचा, मृत्यू त्या ठिकाणी होत असेल तर माणूस तर गेलाच पण शेवटी त्या परिवाराचा काय होतं, ते तुम्ही आम्हाला विचारा, त्यामुळे जे अमित ठाकरे बोलत आहे ते खरं आहे, या राज्यातून जे काही नेते आहेत त्यांच्या मनातून आणि अधिकाऱ्यांच्या मनातून माणुसकी संपली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.