… तर मढी गावाने घेतलेला निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल; मंत्री नितेश राणेंचा इशारा
अहिलीनगर: जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढीच्या जत्रेत मुस्लिम (मुस्लिम) बांधवांना दुकाने लाऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. आता, राज्याचे मंत्री आणि हिंदुत्त्ववादी नेते म्हणून सातत्याने आपली व भाजपची भूमिका मांडणाऱ्या नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मढी गावातील ग्रामपंचायतीच्या ठरावाचं समर्थन केलं आहे. मढी गावाने जो निर्णय घेतला तो इतिहासात लिहिला जाईल, जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मढी गावाने केले. मढी गावातील कडवट विचाराचे हिंदू जागृत झाले. देशाला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे, अशा शब्दात मंत्री राणे यांनी मढी गावच्या ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावावर भाष्य केलं आहे. गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असेही राणे यांनी म्हटले. दरम्यान, येथील मढी गावच्या यात्रेत मुस्लीम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता. मात्र, येथील गटविकास अधिकाऱ्यांनी तो ठराव रद्द केल्याने नितेश राणे यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांनाच इशारा दिला आहे. मढी गावात हिंदू धर्म सभेतून बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापार्यांना कानिफनाथ यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच, राज्यातही या ठरावाची चर्चा होऊन विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. दरम्यान, गटविकास अधिकार्यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर, पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना चौकशी अहवाल पाठवला असून मुस्लीम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच, आज अहिल्यानगर दौऱ्यावर असलेल्या मंत्री नितेश राणे यांनी या ठरावावर भाष्य करत बीडीओंना देखील इशारा दिला आहे.
मढी गावाने जो निर्णय घेतला तो इतिहासात लिहिला जाईल, जिहाद्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मढी गावाने केले. मढी गावातील कडवट विचाराचे हिंदू जागृत झाले. देशाला दिशा देणारा मढी गावाचा निर्णय आहे, अशा शब्दात मंत्री राणे यांनी मढी गावच्या ग्रामपंचायतीने संमत केलेल्या ठरावावर भाष्य केलं आहे. गटविकास अधिकाऱ्याला कळू द्या हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असेही राणे यांनी म्हटले. आम्ही तुमच्या धर्माच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्हाला चालेल का?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. रामगिरी महाराजांनी जर एखादी भूमिका घेतली तर तुम्हाला मिर्चा का झोबतात?. हिंदू धर्माला जर आव्हान देण्याचे काम केले तर मढी गावाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल. आम्ही आमदार, मंत्री झालो ते हिंदू जनतेने मतदान केले म्हणून झालोय. आता मोर्चे काढण्याची, आंदोलनांची गरज नाही. ते दिवस गेले, आता सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी विशिष्ट समाजाला उद्देशून भाष्य केलं.
तुम्ही पु्न्हा ठराव करा, मी बीडीओचं बघतो
मढी गावचा ठराव जरी रद्द झाला तरी पुन्हा ठराव करा आणि सर्व ग्रामस्थांनी त्या ठरावावर सह्या करा. सर्व ग्रामस्थांनी ठरावावर सह्या केल्या की मी बघतो बीडीओ कसा ठराव रद्द करतो, असेही राणेंनी म्हटले. राज्यातील अनेक ठिकाणी या लोकांनी केलेले अतिक्रमण काढली जात आहेत. ज्या धर्मात मूर्तीपूजेला विरोध आहे, त्या लोकांना आपल्या यात्रेत दुकानं का लावून द्यावी? तुम्हाला जर आमच्या धार्मिक ठिकाणी येऊन जिहाद करायचा असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, अशी भूमिका राणे यांनी येथील जाहीर भाषणातून व्यक्त केली.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.