धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला

सोलापूर क्राइम न्यूज: राज्यात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हत्या, खूनांच्या घटना वाढत असताना सोलापूरच्या करमाळ्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतात झाडं काढण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी एका शेतकऱ्याचा खून केल्याची घटना समोर आलीय. या घटनेनंतर दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटकही केलीय. शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात अशा प्रकारे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे घडली आहे. या प्रकरणात दोन सख्ख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

झाडे काढण्यावरून वाद, थेट हाणामारीपर्यंत

प्राथमिक माहितीनुसार, अर्जुननगर येथे शेताच्या बांधावर असलेल्या झाडे काढण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याच वादातून दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. या मारहाणीत भुजंग सावळा रोकडे यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तात्याबा बाबुराव रोकडे आणि नागनाथ बाबुराव रोकडे या दोघांविरोधात करमाळा पोलिसात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 103(1), 115(2), 3(5), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे. या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे अर्जुननगर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रांजणगावमधील हत्याकांडाचं गुढ उलगडलं

पुण्यातील रांजणगावमध्ये 10 दिवसांपूर्वी आढळून आलेल्या तीन मृतदेहांचे गुढ उकलण्यात पोलिसांनी (Police) यश आलं आहे. एका 25 वर्षीय महिलेसह तिच्या लहान दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित महिला या परिसरातील कोणाच्याही परिचयाची नव्हती. त्यामुळे, पोलिसांना या घटनेचा तपास करण्यासाठी अधिक वेळ लागला. अखेर, 10 दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अनैतिक संबंधातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याचं तपासातून समोर आलं आहे. संबंधित महिला बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगावची असल्याचे तपासातून निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष 6 तपास पथकांची नेमणूक केली होती. राज्यभरातील 33 पोलिस ठाण्यांतील अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका यांच्या मदतीने सुमारे 16,500 भाडेकरूंना विचारपूस करुन आणि 250 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करुन पोलिसांनी हत्याकांडाचा तपास उलगडला.

Ashok Dhodi Case : पाच महिन्यांपासून गुंगारा, अखेर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांना गवसला, दादरा नगर हवेलीतून ठोकल्या बेड्या

आणखी वाचा

Comments are closed.