बायकोची डायरी वाचली अन् पायाखालची जमीन सरकली, फसवणूक झाल्याची बिहीणीला सांगितली व्यथा, लग्नानंत
बीड/अंबाजोगाई : बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, लग्नानंतर अवघ्या बाराव्या (Beed Crime News) दिवशीच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या गणेश दत्तू कोळी (वय २६) या तलाठी पतीने कौटुंबिक वादातून अंबाजोगाई येथे गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली होती. पत्नीने (Beed Crime News) पतीला स्वीकारण्यास दिलेला नकार, या धक्क्यातूनच पतीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी मृत तलाठी तरूणाच्या आईने दिलेल्या जबाबावरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.(Beed Crime News)
लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा (ता. औसा) येथील अंगणवाडीसेविका सुनंदा दत्तू कोळी यांचा मुलगा गणेश दत्तू कोळी हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १४ संभाजीनगर येथे पोलिस शिपाई म्हणून भरती झाला होता. नोकरीत असतानाच गणेशने चंद्रपूर येथे तलाठी पदाची परीक्षा दिली आणि २०२४ मध्ये तो तलाठी म्हणून रूजू झाला. त्याचा विवाह १३ मे २०२६ रोजी बीड येथील एका कार्यालयात पार पडला होता. पत्नीही शासकीय नोकरी करत आहे. ४ जून रोजी अंबाजोगाई ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे(Beed Crime News)
Beed Crime News: देवदर्शनाहून घरी परततानाच संशय आला अन्…
लग्नानंतर दोघेही कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना पत्नीला कोणाचा तरी फोन आला, ज्याबाबत विचारणा केली असता, तिने बोलण्यास नकार दिला. १८ मे रोजी घरी सत्यनारायणाची पूजा झाली. मात्र, त्यानंतर गणेश कमालीचा नाराज राहू लागला. त्यानंतर, पत्नीही नातेवाइकांसोबत माहेरी बीडला निघून गेली.
Beed Crime News: फसवणूक झाल्याची खंत त्याने बहिणीजवळ केली व्यक्त
२५ मे २०२६ रोजी सकाळी गणेश कोळीने त्याच्या बहिणीला फोन करून आपली व्यथा मांडली. तो म्हणाला, लग्न करून माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे. पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. तिने तिच्या डायरीमध्ये तसे लिहून ठेवले आहे, जे मी स्वतः वाचले. मी विचारणा केली असता, तिने माझ्यासोबत जोरदार भांडण केले. या संभाषणानंतर गणेशचा फोन बंद झाला. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
Beed Crime News: माझ्या मनाच्या विरुद्ध लग्न लावून दिलं…
दोन दिवसांनी सासरी येण्यासाठी फोन केला असता, सुनेने सासूला स्पष्ट सांगितले की, ‘माझे लग्न माझ्या मनाच्या विरुद्ध लावून दिले आहे. मला गणेशसोबत राहायचे नाही.’ ती घरात असतानाही सतत फोन लॉक करून कोणाशी तरी बोलायची. दरम्यान, पत्नीने गणेशला सतत फोन करून अंबाजोगाईला बोलावून घेतले. २४ मे २०२६ रोजी गणेश तिला भेटण्यासाठी अंबाजोगाईत ती राहत असलेल्या खोलीवर गेला.
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Comments are closed.