Ajit Pawar appeals not to believe rumors after bridge collapses on Indrayani river in Pune
आज (15 जून) पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवर असलेल्या जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सातत्याने वेगवेगळे अपघात होताना दिसत आहेत. आज (15 जून) पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवर असलेल्या जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळल्यानंतर 30 हून अधिक पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. याचपार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (Ajit Pawar appeals not to believe rumors after bridge collapses on Indrayani river in Pune)
अजित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – Indrayani River Bridge Collapsed : पर्यटनासाठी जाताना काळजी घ्या, कुंडमळा घटनेनंतर खासदार सुळेंचे आवाहन
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 15, 2025
जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. तसेच राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
हेही वाचा – Politics : काही लोकांनी रुमाल वेटरसारखा खांद्यावर टाकला; भरत गोगावलेंनी तटकरेंची उडवली खिल्ली
Comments are closed.