मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण
मुंबई : वसईत 19 वर्षीय रेवती निळे तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज वसई पोलीस ठाण्यात येऊन, पोलिसांना (police) जाब विचारला आहे. मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने 28 एप्रिल 2025 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप, तरुणीच्या कुटुंबियांनी केला होता. अजय राणा या पुजाऱ्याचा मुलगा आयुष राणा याच्यासोबत तरुणीचे प्रेम संबंध होते. मात्र, कुंडलीत मृत्यू योग असून, तू खालच्या जातीची आहेस. त्यामुळे माझ्या मुलासोबत तुझे लग्न होऊ शकत नाही असे आयुषचे वडिल मांत्रिक अजय राणा यांनी सांगितले. याच नैराश्यातून मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला होता.
अजय राणा हे वसई किल्ल्यातील हनुमान मंदिराचे पुजारी आहेत. याबाबत वसई पोलीस ठाण्यात पुजारी आणि त्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला होता. मुलाला मुंबई उच्च न्यायालयातून बेल मिळाल्याने, वसई पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. राजकीय दबावामुळे पोलिसांनी प्रकरण योग्य हाताळलं नाही. त्यामुळेच, या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी वसईत आले आणि न्याय मिळेपर्यंत मी लढणार असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. तर मृत रेवतीच्या आईने आरोपींना शिक्षा होऊन आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अंजली दमानिया यांनी वसई पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांची भेट घेतली तसेच वसई किल्ल्यात हनुमान मंदिरात ज्यात पुजारी अजय राणा हा पूजा विधी तसेच वास्तव करत होता, तेथेही भेट दिली. तसेच, ही वास्तू पुरातत्व खात्याची असून, हा पुजारी येथे कसा वास्तव करतो याबाबत साशंकता व्यक्त केली. तसेच या पुजाऱ्याच्या सांगण्यावरुन, वसई पोलीस ठाण्याचे तत्काळीन पोलीस निरीक्षक यांनी दरवाजाची दिशा बदलल्याचा आरोपही दमानिया यांनी केला आहे. येथील काही राजकारणी आणि पोलीस देखील याच्या अधीन गेल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, अंजली दमानिया गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत.
शिवसेना नेत्याचं स्पष्टीकरण
दरम्यान, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख निलेश तेंडूलकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाबाबत बोलताना तेंडूलकर यांनी राणा कुटुंबाला आपण ओळखत नसल्याचं, सांगत आपण चुकीच्या गोष्टीत कुणाला मदत केली नसल्याच स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा
एक गाव भोसरी अन् 10 गावं दुसरी; विलास लांडेंचं नाव घेत अजित पवारांची मिश्कील फटकेबाजी
आणखी वाचा
Comments are closed.