अशोक खरातचा सीडीआर कुठून आला?; अंजली दमानियांनी ऑन कॅमेरा दाखवलं, ऑडिओ क्लिपही ऐकवली, नंतर भर प
अंजली दमानिया: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अटकेनंतर दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात एक खळबळजनक दावा केला होता. दमानिया यांनी थेट अशोक खरातच्या मोबाईलचा CDR, म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड समोर आणला असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरातला तब्बल 17 वेळा फोन केल्याची नोंद या CDR मध्ये आढळून आली. अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर त्यांच्याकडे नेमका सीडीआर आला तरी कुठून? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. आता अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केलाय. अशोक खरातचा सीडीआर कुठून आला? याबाबत अंजली दमानियांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
अंजली दमानिया म्हणाल्या की, सीडीआर आला कुठून वगैरे हे मी ऐकत आले. 31 तारखेपासून कालपर्यंत मी मुंबईत नव्हते. चंडीगडमध्ये कोणताही मराठी मीडिया नव्हता. मला माझी प्रतिक्रिया तिथे देता येईना. राऊत बोलतात मी रॉ एजंट आहे का? अंधारे यांचा तर विषयच दमानिया असतो. मला सुरुवातीपासून सगळं सांगायचं आहे. 1 एप्रिलला दुपारी 1 वाजता मला एक फोन आला, खरातची माहिती माझ्याकडे आहे, खरातचा सीडीआर माझ्याकडे आहे, असं त्याने सांगितलं . मला सांगितलं की, तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. त्याने मला सगळं पाठवलं. रात्री मला वेळ मिळाला, तेव्हा मी सगळं बघितलं. मला त्यात कंपनीचे नाव वगैरे सगळं आलं. एक्सेल शिट खरी आहे का? हे तपासायला मी क्लॉडवर टाकलं, असे त्यांनी म्हटले.
Anjali Damania: ॲक्टिव्हिस्टला कधी कधी वापरलं देखील जातं
यानंतर अंजली दमानिया यांनी ऑडीओ रन केला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी हे सदानंद दाते यांना हे पाठवलं आहे. मुद्दाम हे माझ्यापर्यंत पोहोचवून दाखवले आहे का? ॲक्टिव्हिस्टला कधी कधी वापरलं देखील जातं. आता या माहितीचे असिसमेंट कसं दाखवलं जातं? कॉल हिस्ट्री घातल्याने मी सीडीआर घातला, तेव्हा सविस्तर माहिती आली. मी अनधिकृत गोष्टी मागत नाही. माझ्याकडे माहिती आली ती यंत्रणांना पाठवली. तेजस्वी सातपुते आणि गृहमंत्र्यांना माहिती पाठवली.
Anjali Damania: मिलिंद नार्वेकर यांचे 8 कॉल आले, काय बोलता अंधारे बाई?
देवेंद्र फडणवीसचित्रा वाघ, गिरीश महाजन, सुषमा अंधारे, विखे पाटील, मोहित कंबोज, प्रसाद लाड इत्यादी लोकांचे खरात बरोबर कॉल नव्हते. मिलिंद नार्वेकर यांचे 8 कॉल आले, काय बोलता अंधारे बाई? लढायचे कोणासोबत अंधारे बाई? तुम्ही राजकारण करतायत. यात समरी येते, इन्कमिंग, आऊटगोईंग, सर्वात मोठे कॉल अशी माहिती येते. संजय शिरसाट, मिलिंद नार्वेकर यांचे कॉल रेकॉर्ड त्यांच्या बरोबर मिळाले. प्रभाकर काळे एकनाथ शिंदे यांचे पीए आहेत. कॉल काळेंनी केले की शिंदेंनी केले? याबाबत मला घेणं देणं नाही. मात्र, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
Anjali Damania: अंजली दमानियांना अश्रू अनावर
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, सुनिल तटकरे, आशिष शेलार, चाकणकर यांनी कॉल का केले? केसरकर यांचे पीए देखील त्यात आहेत. सीएम लॉबीचे कॉल नाही, त्याला मी काय करु? फालतू काहीही बोलायचं. आज दुपारी चार वाजता सदानंद दाते यांनी मला वेळ दिली आहे. त्यांना शोधू दे, मला सीडीआर कुठून आला? काय आला? समता नावाची एक पतसंस्था आहे. अशोक खरातला पैसे डिपॉझिट झाल्याचे मॅसेज यायचे. फेब्रुवारी 2025 पर्यंत अत्यंत कमी मॅसेजेस यायचे. अजित पवार यांचा अपघात व्हायच्या एक दिवस आधी 17 मॅसेज होते. 27 जानेवारीला 17 मॅसेजेस, 29 जानेवारी 10 मॅसेज, 31 जानेवारी 12 मॅसेजेस आलेले आहेत. खरातच्या खात्यात पैसे डिपॉझिट झालेत की काढले गेलेत, हे त्यांना शोधायचे आहेत. यंत्रणेची हिंमत आहे का? शिंदेंचे इतके कॉल बाहेर काढायची. शिंदेंना विचारायची गरज नाही का? का इतके कॉल केलेत. माझे डोळे झिजले पण मी ते शोधले, असे म्हणत अंजली दमानिया यांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले.
Anjali Damania: मुख्यमंत्र्यांना सांगून काही उपयोग नाही
समता पतसंस्थेचे जे जानेवारी महिन्यात एसएमएस आले आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. अनेक महिने असे मॅसेज नव्हते. काय देवाणघेवाण झाली? काय व्यवहार झालेत? याची चौकशी झाली पाहिजे. समतेची काय उलाढाल झाली? हेच निदर्शनास आणून द्यायचं होतं. मुख्यमंत्र्यांना सांगून काही उपयोग नाही. कारण ते राजकारणच करु इच्छितात. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पार्थ पवार यांचा रिपोर्ट दिला. मला आता फक्त सदानंद दाते यांच्याकडून आशा आहे. मी त्यांना माहिती देणार आहे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.