महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… आदित्य ठाकरे कडाडले
सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहात अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे कडाडले आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, आज आपला ६० वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल! असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आज आपला ६० वा वर्धापन दिन!
पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत!
कितीही कारणे द्या…
सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे…— Aaditya Thackeray (@AUThackeray) 19 जून 2026
Comments are closed.