जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्य

मराठी and Jayant Patil meeting: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भेट घेतली. जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते भेटीदरम्यान फक्त जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार अशा चर्चा असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील झाल्यास जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळणार, या चर्चेला आणखी बळकटी मिळाली असून त्याच संदर्भात कालच्या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान,  मागील दोनच दिवसांच्या आत जयंत पाटील यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Maharashtra Politics new)

मंगळवारी रात्री अचानक सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी जयंत पाटीलही त्याठिकाणी गेले होते. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, वर्षा बंगल्यावरील या बैठकीची माहिती सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नसल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बुधवारी सुनील तटकरे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांना भेटीबाबत माहिती दिली होती. मात्र, जयंत पाटील यांच्या भेटीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एनडीएतील समावेशाबाबत वर्षा बंगल्यावरील बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. आम्ही संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देऊन हे आश्वासन देण्यासाठी जयंत पाटील बैठकीला आल्याचे सांगण्यात येते. मात्र, या सगळ्याबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे बुधवारी रात्री पार्थ पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी फडणवीसांनी यापुढे घटकपक्षांच्या नेत्यांसोबत कोणतीही बैठक असल्यास राष्ट्रीय अध्यक्षाला कळवले जाईल, असे आश्वासन सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Amol Mitkari: वरिष्ठ नेते परस्पर मुख्यमंत्र्यांना भेटतात, ही अतिशय गंभीर बाब; सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Comments are closed.