राज्यात भाजपचं सरकार आणण्यात शरद पवारांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा: मंत्री प्रतापराव जाधव

प्रतप्राव जाधव बुलढाणा: शरद पवार (Sharad Pawar) यांनी  वेळोवेळी भाजपला(BJP) मदत केली आहे, शिवाय राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे आता या देशात मी कसा मोठा विरोधक आहे. हे दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही त्यांनी केली आहे.

दरम्यान, 2014 साली राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. वेळोवेळी त्यांनी भाजपला मदत केली आहे. मात्र आता त्यांना एवढा भाजपचा तिटकारा का? तर देशात सर्वात मोठा विरोधक मी व माझा पक्ष, हे दाखवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांना लगावला आहे. काल(18 जून) ते बुलढाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हिंदू धर्मात कोणी कुठे कशी पूजा करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न- प्रतापराव जाधव

राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जर दारूचे भाव कमी पाहिजे असतील तर मी सरकारला त्यांच निवेदन देईल. असेही प्रतापराव जाधव म्हणाले. सोबतच हिंदू धर्मात कोणी कुठे कशी पूजा करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे रायगडमध्ये काही पूजा झाली असेल तर त्यात गैर काय? असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला आहे.

तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली’ असं सांगून जनतेची फसवणूक-  सपकाळ

फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केलाय. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली’ असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो? तर हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार आहे. इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान 20 विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली आहे. म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट आहे. असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट द्वारे म्हटले आहे. हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचे कारस्थान आहे. फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नाही, दिल्लीश्वरांशी आहे, हेच यातून स्पष्ट होते. वारंवार बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेणा-या शिंदे गटाकडेच शिक्षणखातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे.

अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांना तर महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय मेले काय? याच्याशी काही देणे घेणे नाही. फक्त आपल्याला अर्थखातं मिळावे, हेच अजित पवारांचे धोरण आहे. संघ आणि भाजपचा हा ‘एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती’ चा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो  झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही! असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.