मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात थेट सहभागी होणार ठाकरेंच्या शिवसेनेचा दुसरा खासदार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत गणपतीची आरती करुन जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात मोर्चासाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजानेही जरेंग पाटील (मनोज जरेंगे) यांच्या आंदोलनास विरोध करत साखळी उपोषणातून आपली भूमिका स्पष्ट केलीय. मात्र, गावागावात जरांगे पाटील यांचे जोरदार जल्लोषात स्वागत होत असून सत्कार करत मराठा युवक आंदोलनात सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena) परभणीतील खासदार संजय बंडू जाधव यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती. आता, आणखी एका हिंगोलीतील (Hingoli) खासदाराने जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबई येथे मोर्चा काढून आझाद मैदानावर आंदोलनास बसणार आहेत. या आंदोलनामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी परभणीचे खासदार बंडू जाधव यांनीही आपली भूमिका जाहीर करत जरांगे पाटलांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. ”मनोज जरांगे यांना 5 हजार आंदोलक घेऊन एक दिवस आंदोलनाची संधी मिळाली, तो कोर्टाचा प्राथमिक निर्णय होता. जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत आहेत, त्यामुळे या मोर्चाची सरकारला काही अडचण नसावी. जरांगे यांच्या आंदोलनास ज्यांना जायचं आहे, ते सर्वजण निघालेले आहेत. उद्या सकाळी मी मुंबईला निघणार आहे, आणि त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे,” असे खासदार नागेश आष्टीकर यांनी म्हटले.

आठवलेंचाही आंदोलनास पाठिंबा (Ramdas athavale)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. तर, महायुतीमधील रिपाइं आठवले गटाचे प्रमुख मंत्री रामदास आठवले यानीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, मराठा आरक्षणास आपला पाठिंबा असून आंदोलनातील प्रमुख मागणी असलेल्या ओबीसीतून आरक्षणास आपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

हेही वाचा

मनोज जरांगेंच्या आंदोलनास रामदास आठवलेंचा पाठिंबा, पण..; आरपीआयच्या शिबिरात ठराव मंजूर

आणखी वाचा

Comments are closed.