आपलं म्हणणं रेटून नेणं म्हणजे सरकार चालवणे नाही, याला हुकुमशाही म्हणतात; उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाचा दुरान्वयेही संबंध नाही. सरकारला जनतेच्या, युवकांच्या प्राणाची किंमत नाही. आपले म्हणणे रेटून नेणे म्हणजे सरकार चालवणे नाही. याला हुकुशाही म्हणतात, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या लुटीविरोधात हिंदू जागृतीसाठी शिवसेनेने मुंबईतून रामरक्षा आंदोलनाची ठिणगी पेटवली. या राज्यव्यापी आंदोलनाचा पुढचा टप्पा उद्या उपराजधानी नागपुरातून सुरू होत आहे. नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. आंदोलनासाठी उद्धव ठाकरे नागपूर येथे दाखल झाले. यावेळी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईवरून भाजप सरकारवर हल्ला चढवला.

Comments are closed.