उल्हासनगर महापालिकेत शिवसेना अन् भाजपमध्ये घमासान; विरोधी पक्षनेते नियुक्तीवरून गदारोळ

उल्हासनगरचे राजकारण ठाणे : उल्हासनगर महानगरपालिकेच्या (Ulhasnagar Municipal Corporation) महासभेत शिवसेना आणि भाजपामध्ये (Shiv Sena vs BJP Clash) तीव्र वाद निर्माण झालाहे. जेव्हा महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी अचानक एकमेव काँग्रेस (Congress) नगरसेविकेला विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केल्याने हा वाद झाल्याचे बोललं जातंय. 78 सदस्यीय सभागृहात या निर्णयानंतर भाजपच्या (BJP) नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शवला आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. विरोध सुरू असतानाच महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करून सभा तहकूब केली. भाजपानेया निर्णयाला “युती धर्माचा भंग” असे संबोधत शिवसेनेवर (Shiv Sena) पूर्व चर्चा न करता निर्णय घेतल्याचा आरोप केलाहे.

Ulhasnagar Clash : महापालिकेत शिवसेनेसोबतची युती कायम ठेवायची की नाही, वरिष्ठ नेत्यांसमोर मुद्दा मांडणार

दरम्यानभाजपाचे गटनेते राजेश वधारिया यांनी सांगितले की, कायद्यानुसार फक्त एक नगरसेवक असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्रता नसते. त्यामुळे हे पद भाजपाला मिळायला हवे होते, असा त्यांचा दावा आहे. वधारिया यांनी असा आरोपही केला की हा विषय कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सभागृहात मांडण्यात आला, ज्यामुळे भाजपाला आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी पुढे सांगितले की, हा मुद्दा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला जाईल आणि महापालिकेत शिवसेनेसोबतची युती कायम ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच महापौरांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याबाबतही विचार सुरू आहे.

Shiv Sena vs BJP Clash: महापालिका सचिवांवरही नियमांनुसार कामकाज न केल्याचा भाजपचा दोष

दरम्यान, भाजपाच्या नगरसेवकांनी महापालिका सचिवांवरही नियमांनुसार कामकाज न केल्याचा आरोप करत त्यांचा घेराव केला. त्यानंतर काही नगरसेवकांनी आयुक्त मनीषा आव्हाले यांच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन केले. भाजपाच्या नेत्यांनी असा आरोप केला की महापौरांनी दुसऱ्यांदा अशा प्रकारे शेवटच्या क्षणी विषय आणून आणि जन गण मन सुरू करून प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न केला, जे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही. यावर शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी कमलेश निकम यांनी महापौरांच्या निर्णयाचे समर्थन केले. विरोधी पक्षनेते निवडण्याचा अधिकार हा महापौरांचा विशेषाधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस हा एकमेव विरोधी पक्ष असल्याने त्यांच्या नगरसेवकाची निवड करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ulhasnagar politics : विरोधी पक्षनेते पदाची मागणी कशी करू शकते?

भाजपाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत निकम म्हणाले की, भाजपाच जर सत्तेत सहभागी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची मागणी कशी करू शकते ? या घटनेमुळे महापालिकेतील शिवसेना-भाजपा युतीतील मतभेद उघड झाले असून, येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर न्यूज : आयुक्तांच्या दालनासमोर गोंधळ !

नेमणुकीच्या विरोधात महासभेत झालेल्या गोंधळ प्रकरणी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सर्व पक्षाच्या गटनेत्यांना दालनात बैठकीसाठी बोलावले. या बैठकीला शिवसेना गटनेते अरुण आशान यांच्याबरोबर महापौरांचे पती कमलेश निकम हे सुद्धा महापौर यांचे प्रतिनिधी म्हणून आयुक्त भेटीला गेले. यामुळे चिडलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, नगरसेवक संजय सिंग, टोनी सिरवाणी, भाजप कार्यकर्ते अवि पंजाबी, आकाश चंदनानी आदींनी धक्काबुक्की करीत आयुक्त दालनात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी अटकाव केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि भाजप पदाधिकारी यांच्यात वादाच्या फेरी उडाल्या. अखेर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे आणि त्यांच्या पोलीस पथकाने पालिका मुख्यालयाचा ताबा घेतल्यानंतर वाद निवळला.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम मधील कलम 19 (1) (ब) नुसार विरोधी बाकावर बसलेल्या पक्षाच्या गटनेत्यांपैकी ज्या पक्षाची सदस्य संख्या सर्वाधिक असते. त्या पक्षाचा गटनेता हा विरोधी पक्ष नेता असतो. मात्र उल्हासनगर मध्ये काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडून आला असून काँग्रेस हा एकमेव पक्ष विरोधात बसला आहे. भाजपने शिवसेनेबरोबर युती करत उपमहापौर पद ताब्यात घेतले आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देत लोकशाही मजबूत केल्याचे शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.