15 वर्षांच्या पोराला बसवून काय मिळालं? लाजीरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरवर भडकले चाहते, दुसऱ्या
Vaibhav Sooryavanshi India vs Ireland 2nd T20 : आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात शुक्रवारी भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या धक्कादायक पराभवानंतर 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला प्लेइंग-11 मध्ये न खेळवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. चाहते फक्त कर्णधार श्रेयस अय्यरवरच नाही, तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही प्रचंड नाराज झाले आहेत. या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 182 धावांचे मोठे आव्हान उभे केले होते, प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ अवघ्या 148 धावांवर गारद झाला.
𝗜𝗻𝗱𝗶𝗮 गंभीरच्या खाली
– 27 वर्षांनंतर, SL विरुद्ध द्विपक्षीय एकदिवसीय मालिका गमावली
– पहिल्या वेळी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 30 विकेट गमावल्या
– 45 वर्षांनंतर, भारत एकदिवसीय सामन्यांमध्ये कॅलेंडर वर्षात विजयी राहिला
– 36 वर्षांनंतर, भारत घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी हरला
– 19 वर्षांनंतर, भारत येथे कसोटी हरला… pic.twitter.com/F2YDQZMfEV— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) 26 जून 2026
बेलफास्टमध्ये रचला गेला इतिहास
शुक्रवारी बेलफास्टच्या मैदानावर एक नवा इतिहास रचला गेला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडने कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचा पराभव केला आहे. गोलंदाजांचा फ्लॉप शो: सामन्यात गोलंदाजीची सुरुवात चांगली झाली असली तरी मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी धावांची खैरात केली. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने एकाच षटकात तब्बल 27 धावा लुटवल्या. भारताच्या तगड्या फलंदाजीचा विचार करता 183 धावांचे लक्ष्य फार मोठे नव्हते, परंतु आयर्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे स्टार फलंदाज पत्त्यांसारखे कोसळले.
अखेर अंतिम निकाल लागला आहे. भारतीय संघाला आयर्लंडकडून ऐतिहासिक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
सर्वात मोठ्या पराभवाची कारणे :-
सूर्यकुमार यादव यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
महंमद सिराजला खाऊ घालू नका.
वैभव सौर्यवंशी खात नाही.
हार्दिक पांड्याला खाऊ घालू नकाकोणत्याही कारणाशिवाय वॉशिंग्टन सुंदर… pic.twitter.com/eG2WNw6t5n
— गुलजारची डायरी.🏔️🌿 (@drx_gulzar) 26 जून 2026
सामन्यापूर्वी सर्वांनाच अपेक्षा होती की युवा खळबळ वैभव सूर्यवंशीचे पदार्पण (डेब्यू) होईल, मात्र त्याला संघात स्थान दिले गेले नाही. आता या लाजिरवाण्या पराभवानंतर संघ व्यवस्थापनाच्या या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
🚨 गौतम गंभीरच्या चुका 🚨
– विश्वचषक विजेत्या कर्णधार सूर्यकुमार यादवला काढून टाकले.
– गेल्या दोन वर्षांपासून T20I संघाचा भाग नसतानाही श्रेयस अय्यरला कर्णधार बनवले.
– रजत पाटीदार, राजकुमार यादव यांना संधी देऊ नका.
– लाल-गरम तरुणांना बेंच केले … https://t.co/A8VGEmrXBd pic.twitter.com/hrDUhIdLdS
— स्पोर्ट्स क्लब (@SportsxClub) 26 जून 2026
दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार का?
सोशल मीडियावर सध्या चाहत्यांकडून वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळवण्याची जोरदार मागणी केली जात आहे. खरं तर पहिल्या सामन्यापूर्वीही ही मागणी होत होती, परंतु व्यवस्थापनाने आधीपासून संघात असलेल्या आणि चांगली कामगिरी करत आलेल्या खेळाडूंना डच्चू देणे योग्य समजले नाही. परंतु, आता जेव्हा भारताची टॉप ऑर्डर पहिल्याच सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे, तेव्हा चाहत्यांना आशा आहे की रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात या 15 वर्षीय धडाकेबाज सलामीवीराला प्लेइंग-11 मध्ये नक्कीच संधी दिली जाईल.
मायकल वॉन यांनीही व्यक्त केले आश्चर्य
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही वैभव सूर्यवंशीला प्लेइंग-11 मध्ये स्थान न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे, संतप्त भारतीय चाहत्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग काढला आहे.
🚨 भारतासाठी मोठा अपमान 🚨
– वैभव सूर्यवंशीला स्थान नाही, जो जवळजवळ प्रत्येक सामन्यात मौजमजेसाठी चौकार मारतो.
– आयपीएलच्या सर्वोत्कृष्ट हंगामानंतर संघात रजत पाटीदार आणि प्रिन्स यादव नाहीत
– आमचे व्हीसी टिळक वर्मा 120 SR सह टी-20 खेळत आहेत पण तरीही प्रत्येक खेळण्याची संधी मिळते… pic.twitter.com/8hasil8Uqf
— स्पोर्ट्स क्लब (@SportsxClub) 26 जून 2026
कधी आणि कुठे होणार दुसरा टी-20 सामना?
भारत आणि आयर्लंड यांच्यातील मालिका जिवंत ठेवण्यासाठी भारताला दुसरा सामना जिंकणे अनिवार्य आहे. दुसरा टी-20 सामना रविवार, 28 जून रोजी होणार आहे. हा सामनादेखील बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर खेळला जाईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6:00 वाजता सुरू होईल.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.