राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी, गुन्हा नोंद होऊ शकतो; असीम सरोदे काय म्हणाले?

मुंबई : नसरापूर प्रकरणी चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या (Nasrapur Girl Death) आपल्या सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकवणारे वक्तव्य केलं. राज ठाकरेंसारख्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य चुकीचं आहे. पोलिसांनी त्यांना समज द्यावी असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं. तसेच प्रवीण तरडेंनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. आपल्या सर्वांच्या भावना जरी तीव्र असल्या तरी आरोपीला कायद्याच्या प्रक्रियेतूनच शिक्षा झाली पाहिजे असंही ते म्हणाले.

आरोपीला फाशीच होणार

असीम सरोदे म्हणाले की, “नसरापूर या गावात एका 75 वर्षांच्या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्या चिमुरडीच्या कुटुंबाचे दुःख आपण कुणीही समजून घेऊ शकत नाही. त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. या केसमध्ये 101 टक्के त्या नराधमाला फाशीची शिक्षाच होणार हे कायदेशीर वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे.”

असीम सरोदे पुढे म्हणाले की, “या प्रकरणात काहीही बेताल वक्तव्य करत लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि त्या माणसाला हालहाल करून मारा, आपणच त्याला शिक्षा देऊयात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे प्रवीण तरडे यांनीसुद्धा असं वक्तव्य केलं. त्या आरोपीला मारणाऱ्याला आमदार खासदार करा असं प्रवीण तरडे म्हणाले. असं असेल तर प्रवीण तरडे स्वतःच का जात नाहीत? स्वतः त्या आरोपीला मारून आमदार आणि खासदार का होत नाहीत? आमदार आणि खासदार व्हायचे कायदेशीर निकष आता तुम्ही बदलणार का?”

राज ठाकरेंवर गुन्हा नोंद होऊ शकतो

असीम सरोदे म्हणाले की, “तुमच्या भावना जरी बरोबर असल्या तरी कायद्याचं एक तत्व आहे. आरोपीला त्याची बाजू मांडू देऊन, कायद्याच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. राज ठाकरे यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकवू नये. हे चुकीचं आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करू नये अशी समज पोलिसांनी राज ठाकरेंनादिली पाहिजे. राज ठाकरे आणि प्रवणी तरडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही नोंद होऊ शकतो.”

Raj Thackeray On Nasrapur : राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

नसरापूरच्या घटनेनंतर राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला. नसरापुरच्या नराधमाला हाल हाल करुन संपवा, अशी मागणी राज ठाकरेंनी केलीय. तसंच महाराष्ट्रात कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.