आधी ठाकरे बंधु एकत्र येऊ द्या, मग…; रोहित पवारांचं सूचक विधान, महायुतीबद्दलही मोठं भाकीत

मुंबई : राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा घडत असताना दुसरीकडे पवार कुटुंबीयांनी एकत्र आले पाहिजे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्याच अनुषंगाने विचारेलल्या प्रश्नावर उत्तर देताना, उद्धव ठाकरे अन राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू, असं सूचक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. पुण्यातील खेड राजगुरुनगर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे.

राज्यातील महायुती सरकार 2029 च्या लोकसभेपर्यंत टिकेल पण विधानसभा निवडणुकांवेळी मात्र महायुती तुटेल, असं भाकीतही रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. कारण, उद्धव ठाकरे अन राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू, असं सूचक विधानही रोहित पवार यांनी केलं आहे. एकीकडे भाजपने संघटन पर्वच्या माध्यमातून पक्षबळकटी सुरू केली आहे. 2029 च्या निवडणुकीत एकहाती सत्ता खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे यापूर्वीच त्यांच्या नेत्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे रोहित पवारांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधुंनी महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे, अशी मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेकदा बॅनरबाजी करुनही कार्यकर्त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे. त्याच, पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. तर, गेल्या काही महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे विविध बैठकांच्या निमित्ताने एकत्र आल्याचेही दिसून आले.

महाराष्ट्राचा युपी-बिहार झालाय

राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. एकट्या पुण्यात वर्षभरात 650 बलात्काराच्या तर 850 विनयभंगाच्या घटना घडल्यात. जिल्ह्यात रोज 20 महिला बेपत्ता होत आहेत. त्यातून महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होतं. याबाबत ठोस काहीच होत नाही, उलट राजकीय नेतेचं गुन्हेगारांना सोबत बाळगून चुकीची प्रवृत्ती निर्माण करत आहेत. हे पाहता महाराष्ट्राचा यूपी-बिहार झालाय, असं म्हणण्यास हरकत नसल्याचं रोहित पवार म्हणाले.

मुख्यमंत्रीच नाशिकचे पालकमंत्री

नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा तिढा मुख्यमंत्र्यांनी हुशारीने सोडवला आहे. आता, 2027 पर्यंत तरी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीच नाशिकचे पालकत्व पाहतील, पण रायगडचा तिढा मात्र कायम राहील, असे म्हणत रोहित पवारांनी महायुती आलबेल नसल्याचे सांगता महायुतीमधील काही नेत्यांची खिल्ली उडवली.

हेही वाचा

दुष्काळात तेरावा… बीडमध्ये आता पाण्याची चोरी, वृद्ध दाम्पत्याच्या विहिरीतील अडीच परस पाणी पळवलं

अधिक पाहा..

Comments are closed.