मुंबईत 41%, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के
मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी (Election) आज दिवसभर उत्साहात मतदान झाले. मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यात मतदार सकाळपासूनच मतदानासाठी बाहेर पडले होते. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावला, तर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या झेन झी मतदारांनीही (Voter) उत्साहात मतदान केले. मात्र, मुंबईसह महत्त्वाच्या शहरात मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं. मुंबई) दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.08 टक्के मतदान झाले असून मुंबईतील कुलाबा येथील वॉर्ड 227 मध्ये दुपारी 3.30 पर्यंत फक्त 15.73 टक्के मतदान झाले आहे. कदाचित हा राज्यातील सर्वात कमी मतदान झालेला वॉर्ड असू शकेल. दरम्यान, 5.30 वाजेपर्यंतची मतदानाची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी वेळ लागू शकतो, त्यानंतर, अंतिम टक्केवारी अपडेट केली जाईल.
राज्यात 9 वर्षानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानासाठी यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं आहे. सोलापूर महापालिकेतही मतदान टक्का घसरणार असल्याचे दिसून येते, 52 ते 55% मतदानाचा अंदाज व्यक्त होत आहे. सोलापुरात ३.३० वाजेपर्यंत 40.39 टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील 29 महापालिकेमध्ये कुठं, किती मतदान?
बृहन्मुंबई महानगर पालिका: ४१.०८ टक्के
ठाणे : ४३.९६
कल्याण डोंबिवली : ३८.६९
नवी मुंबई– ४५.५१ टक्के
उल्हासनगर : ३४.८८
भिवंडी निझामपूर – ३८.२१
मीरा भाईंदर : ३८.३४
वसई विरार : ४५.७५
पनवेल : ४४.०४
नाशिक : ३९.६४
मालेगाव : ४६.१८
धुळे : ३६.४९
जळगाव : ३४.२७
अहिल्यानगर : ४८.४९
पुणे – ३६.९५ टक्के
पिंपरी चिंचवड – 40.50 टक्के
सोलापूर : 40.39
कोल्हापूर : ५०.८५
सांगली मिरज-कुपवाड : ४१.७९
आहे संभाजीनगर : ४३.६७
नांदेड वाघाळा : ४२.४७
लातूर : ४३.५८
परभणी : ४९.१६
अमरावती : 40.62
अकोला : ४३.३५
नागपूर : ४१.२३
चंद्रपूर : ३८.१२
इचलकरंजी : ४६.२३
जालना : ४५.९४
हेही वाचा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
आणखी वाचा
Comments are closed.